एक्झिट पोल चुकीचा; अंतिम निकालाची वाट पाहू – शशी थरुर

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले असून अनेक वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचे म्हटलं आहे. यंदाही जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपालाच पंसती दिली असून त्यांचीच सत्ता स्थापन होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कॉंग्रेसला 2014 साला प्रमाणेच पराभवला सामोरे जावे लागले आहे, असा अंदाज एक्झिट पोलद्वारे समोर आले आहे. मात्र विरोधी पक्षांनी हा एक्झिट पोल चुकीचा असल्याचे म्हटलं आहे. तसेच 23 मे पर्यंत निकालाची वाट पाहणार असल्याचे कॉंग्रेस नेते शशी थरुर यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले शशी थरुर ?
सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात आला आहे.
या एक्झिट पोलमुळे विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला आहे.
यंदाही जनतेने मोदी आणि भाजपा सरकारला निवडले असल्याचे या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आले आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा सरकार सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कॉंग्रेस नेते शशी थरुर यांनी या एक्झिट पोलबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी हा एक्झिट पोल नाकारला असून निवडणुकांच्या अंतिम निकालांची वाट पाहणार असल्याचे त्यांनी टविटद्वारे म्हटलं आहे.
एक्झिट पोल चुकीचे असून ऑस्ट्रेलियातील 53 एक्झिट पोल चुकीचे ठरले.
भारतात जनता सत्य सांगण्यापासून राहते असं शशी थरुर यांनी म्हटलं.
अंतिम निकाल 23 मे रोजी जाहीर होणार असून तोपर्यंत वाट पाहणार असे मत स्पष्ट केले.
I believe the exit polls are all wrong. In Australia last weekend, 56 different exit polls proved wrong. In India many people don’t tell pollsters the truth fearing they might be from the Government. Will wait till 23rd for the real results.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) May 19, 2019