मराठा क्रांती मोर्चाने मंत्रालयात बुधवारी ठिय्या आंदोलन केले आहे. मराठा क्रांती विद्यार्थ्यांनी मंत्रालयात मोर्चा नेला असून जोपर्यंत भेटीसाठी मुख्यमंत्री येत नाहीत तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा घेतला आहे. सरकारनं ‘संभाजीराजेंना दिलेल्या आश्वासनाचा पाठपुरवठा केला नाही’ म्हणून हा मोर्चा काढला असल्याचे समन्वयकांचे म्हणणे आहे.
मराठा क्रांती मोर्चा समन्वयक ‘मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावा’ असं म्हणत आहेत. जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीसाठी येत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहील असा इशारा मोर्चाच्या समन्वयक तसेच विद्यार्थ्यांनी दिला आहे. तर, याप्रकरणी ‘मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी चर्चा करु’ असं आश्वासन अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे. मात्र, आंदोलनकर्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर ठाम आहेत.
काही दिवसांपूर्वी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या काही मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन केले होते. या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलं होत मात्र त्याची पूर्तता झाली नाही. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मराठा मोर्चाचे समन्वयक विद्यार्थी मंत्रालयात आले होते. मात्र अधिकाऱ्यांकडून त्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी मंत्रालयातच ठिय्या आंदोलन केले आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी याविषयी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करू अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर अडून आहेत. मुख्यमंत्री भेटीसाठी येत नाहीत तोवर आंदोलन संपणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध सहज विजय…
अहमदनगर जिल्ह्यात एका हिंदू महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या भारतीय मानवधिकार परिषेदेने उघडकीस…
मुंबईमध्ये रविवारचा संपूर्ण दिवस मुंबई उपनगरे, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाची संततधार होती. उपनगरांमध्ये…
सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील एक मोठे नेते…
संजय राऊतांची २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणात कारवाई कऱण्यात आली…
बरेच दिवस रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर ठरली आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता काही मंत्र्यांचा…