आपण डाळ, खिचडी, चपाती या अन्नपदार्थांमध्ये आपण तूपाचा वापर करतो.
काहीवेळी तूप खालल्याने फॅट वाढते असे समजले जाते. ज्यांना आपले वजन मेंटेन ठेवायचे आहे असे लोकं तूप खाणे टाळतात. परंतु तूप खालल्याचे अनेक फायदे आहेत.
तूप खाल्ल्याने पचन प्रक्रिया सुलभ करते आणि पचनसंस्थेला मदत करते. यामुळे अपचन, गॅस आणि पोटातील इतर समस्या कमी होतात.
तूप खाल्ल्याने श्वसन मार्गातील सूज कमी होण्यास मदत होते आणि सर्दी-खोकला यावर आराम मिळवता येतो.
तूपामध्ये असलेले फॅटी अॅसिड्स त्वचेला हायड्रेट करतात आणि त्वचेला ताजेतवाने बनवतात. तूप खालल्याने रूप येते असे म्हणतात. पण हो तुप खालल्याने रूप येते. तूपामुळे त्वचा हायड्रेट राहते. तसेच त्वचेला ग्लो येतो.
योग्य प्रमाणात तूप खाल्ल्याने हृदयाशी संबंधित अनेक समस्या टाळता येतात. यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स, एंटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई असतात जे हृदयाला फायदा करतात.
तूप मेटाबॉलिज्मला मदत करते, आणि योग्य प्रमाणात खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.
तूपामध्ये असणारे व्हिटॅमिन K2 हाडांच्या निरोगीपणासाठी फायदेशीर असतो.