भारतातील लोकांना खाऊचे पाने खायला खूप आवडते. याच हिरव्या पानाला विड्याचे पान म्हणून देखील संबोधले जाते.
खाऊच्या पानात पचन सुधारण्यासाठी आवश्यक घटक असतात. हे अन्न पचण्यास मदत करते आणि अपचन किंवा पोटफुगीची समस्या कमी करते.
खाऊचे पान खाल्ल्याने तोंडात लाळेची निर्मिती वाढते, ज्यामुळे तोंड स्वच्छ राहते. पानाचे जीवाणूरोधी गुणधर्म तोंडातील जीवाणूंचा नाश करून दुर्गंधी कमी करतात.
खाऊच्या पानातील अँटीऑक्सिडंट्स रक्तशुद्धीकरणास मदत करतात. ज्यामुळे त्वचेच्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते.
खाऊचे पान सर्दी, खोकला, आणि दमा यांसारख्या समस्यांवर आराम देते. पान उकळून त्याचा काढा घेतल्यास श्वसनमार्गातील अडथळे कमी होतात.
खाऊच्या पानातील अँटीसेप्टिक गुणधर्मांमुळे जखमा भरून येण्यास मदत होते. पानाचा रस लावल्याने त्वचेच्या इजा लवकर भरून येतात.
खाऊचे पान कपाळावर ठेवून मालिश केल्यास डोकेदुखी कमी होते, हे पारंपरिक उपायांपैकी एक आहे.
खाऊचे पान चघळल्याने मेंदूला आराम मिळतो आणि तणाव कमी होतो.