राज्यातल्या 14 साखर कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश!

FRP थकवल्याप्रकरणी राज्यातील 14 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. राज्यातील 14 साखर आयुक्तांकडून 251 कोटींच्या थकीत FRP च्या वसुलीसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश दिले आहेत.
राज्यात एकूण 3595 कोटी रुपये इतकी थकीत एफआरपी आहे. या प्रकरणी काल स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात साखर आयुक्तांची भेट घेतली होती.
कोणत्या साखर कारखान्याचे किती FRP थकीत?
किसनवीर प्रतापगड साखर कारखाना ( सातारा) – 24.63 कोटी
विठ्ठल रिफाईड साखर कारखाना ( सोलापूर ) – 26.71 कोटी
जय भवानी साखर कारखाना ( बीड ) – 30.24 कोटी
रेणुका शुगर – रत्नप्रभा कारखाना ( सोलापूर ) 15.73 कोटी
बबनराव शिंदे साखर कारखाना ( सोलापूर ) – 19.60 कोटी
जयहिंद साखर कारखाना ( सोलापूर ) – 16.24 कोटी
पणगेश्वर साखर कारखाना ( लातूर ) – 13.68 कोटी
जयलक्ष्मी – शीला अतुल साखर कारखाना ( उस्मानाबाद ) – 7.83 कोटी
संत कुर्मदास साखर कारखाना ( सोलापूर ) – 12.22 कोटी
त्रीधारा साखर कारखाना ( परभणी )- 30.82 कोटी
डेक्कन शुगर सागर साखर कारखाना ( यवतमाळ) – 2.75 कोटी
गंगाखेड साखर कारखाना ( परभणी ) – 32.01 कोटी
योगेश्वरी साखर कारखाना ( परभणी ) – 14.81 कोटी
अंबानी शुगर साखर कारखाना ( जळगाव ) – 3.86 कोटी