Monday, February 16, 2026 11:44:49 AM

100 दिवसांत प्रशासकीय कामे पूर्ण नाही झाली तर... मुख्यमंत्री फडणवीस घेणार अधिकाऱ्यांचा समाचार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स संवाद<br/><br/>

100 दिवसांत प्रशासकीय कामे पूर्ण नाही झाली तर मुख्यमंत्री फडणवीस घेणार अधिकाऱ्यांचा समाचार 


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला. या बैठकीत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी 100 दिवसांत प्राधान्याने केली जाणारी कामे निश्चित केली.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, प्रत्येक कार्यालयाच्या वेबसाईटला सुसज्ज करणे आवश्यक आहे, तसेच ती सायबरदृष्ट्या सुरक्षित ठेवावी. माहिती अधिकाराअंतर्गत मागितली जाणारी सर्व माहिती संकेतस्थळावर आधीच ठेवली पाहिजे. याशिवाय, कार्यालयांची स्वच्छता आणि अनावश्यक कागदांचा निचरा करण्याचे निर्देशही देण्यात आले. पिण्याचे पाणी, सार्वजनिक प्रसाधनगृह स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष लक्ष द्यावे.

 

हे ही वाचा : 'नव्या विषाणूबाबत भीती बाळगू नका'

 

मुख्यमंत्र्यांनी इज ऑफ लिव्हिंग आणि इज ऑफ वर्किंगला प्राधान्य देताना, प्रत्येक कार्यालयात किमान दोन सुधारणा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे सांगितले. ते म्हणाले, "पेंडिंग कामे शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करा, आणि सामान्य माणूस कोणत्या वेळेला भेटीला येऊ शकतो, याची माहिती पाटीवर नमूद करा."

 

मुख्यमंत्र्यांनी यावेळी लोकशाही दिनसारखे उपक्रम राबवण्याची आवश्यकता सांगितली. गुंतवणूक आकर्षित करत असताना, लोकांना त्रास न देण्याचे सुनिश्चित करणे, यावरही त्यांनी भर दिला. फ्लॅगशिप कार्यक्रम, शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या जात असल्याची खात्री घेतली पाहिजे, असेही त्यांनी निर्देश दिले.मुख्यमंत्र्यांचे निर्देश यासाठी पालक सचिवांनी लक्ष देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

 

क्लिक करा. -  जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.


ahmedabad schools receive threat email warning of attack
Gujarat Bomb Scare : अहमदाबाद - वडोदरातील या शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; मैलद्वारे धमकी मिळाल्याची शिक्षण अधिकाऱ्याची माहिती

अहमदाबादमधील तीन शाळांच्या कॅम्पसना उडवून दिले जाण्याचा धमकीचा ईमेल मिळाला आहे.

Rashmi Mane

gujarat bomb scare  अहमदाबाद - वडोदरातील या शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मैलद्वारे धमकी मिळाल्याची शिक्षण अधिकाऱ्याची माहिती

गुजरात : अहमदाबादमधील तीन शाळांच्या कॅम्पसना उडवून दिले जाण्याचा धमकीचा ईमेल मिळाला आहे. दुपारी 1.11 वाजता शाळांवर हल्ला केला जाईल, असा ईमेलमध्ये इशारा देण्यात आला होता. पोलीस हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेत आहेत. त्यांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. श्वान पथक आणि बॉम्ब निकामी पथकासह पथके शाळांमध्ये कसून तपासणी करत आहेत. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की अनेक शाळांना असे ईमेल मिळाल्याचे वृत्त आहे. खबरदारी म्हणून जलदगतीने कारवाई करून शाळा बंद करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पाठवण्यात आले आहे. पोलीस आणि सुरक्षा संस्था कॅम्पसमध्ये झडती घेत आहेत. परंतु आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके सापडलेली नाहीत. अधिकारी ईमेलचा स्रोत शोधण्याचे काम करत आहेत. तज्ज्ञांनी म्हटले आहे की, दिल्ली-एनसीआर, नोएडा आणि अहमदाबादमधील मागील घटनांप्रमाणेच धमक्या खोट्या असू शकतात. सुरक्षितता ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता असून कोणताही धोका पत्करला जात नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : Attack on BJP Corporator: भरबाजारात थरार ! भाजप नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला; जुन्या वादातून भरचौकात खंजरने वार