Saturday, April 26, 2025 12:15:30 AM

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?

पुणेरी पाट्या तर सर्वानाच माहितीय. अशातच आता पुण्यात एका बँनरने सर्वांचे लक्ष वेधलंय.&quotमहाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोघा भावांनी एकत्र यावं&quot अश्या आशयाचे बॅनर सद्या पुण्यात झळकताय.

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार

पुणे: पुणेरी पाट्या तर सर्वानाच माहितीय. अशातच आता पुण्यात एका बँनरने सर्वांचे लक्ष वेधलंय."महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोघा भावांनी एकत्र यावं" अश्या आशयाचे बॅनर सद्या पुण्यात झळकताय. त्यामुळे बॅनर आता पुणेकरांच्या चर्चेचा विषय ठरतोय. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेली घटना म्हणजे "महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोघा भावांनी एकत्र यावं" असा उल्लेख असलेले बॅनर. पुण्यातील टिळक रस्त्यावर हे बॅनर झळकले असून, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे बॅनर सदाशिव पेठेत राहणारे प्रकाश गायकवाड यांनी लावले असून, त्यावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. त्याच्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो लावण्यात आला आहे. या बॅनरवर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, "दोन्ही भावांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे."

हेही वाचा:  मनसेचा कोणता नेता जाणार भाजपा विधान परिषदेवर?

राजकीय वर्तुळात चर्चा
राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वाद सुरू आहे. एकेकाळी शिवसेनेचा एक भाग असलेल्या राज ठाकरे यांनी 2006 मध्ये वेगळी वाट धरत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. मात्र, दोघेही महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा सातत्याने मांडत आले आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये मनसे आणि ठाकरे गट एकत्र येऊ शकतात का? याबाबत राजकीय तज्ञ अनेक तर्कवितर्क लावत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात लागलेल्या या बॅनरमुळे चर्चांना उधाण आले आहे.

प्रकाश गायकवाड यांचा संदेश
हे बॅनर लावणारे प्रकाश गायकवाड यांनी सांगितले की, "बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आयुष्य वेचले. त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे."

त्यांनी पुढे असेही म्हटले की, "सध्याच्या राजकीय परिस्थितीत मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पुन्हा हातमिळवणी करावी. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि मराठी जनतेच्या हितासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल."

त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची शक्यता तशी कमीच आहे. मात्र, राजकीय समीकरणे कधीही बदलू शकतात. अशा परिस्थितीत पुण्यात लावलेले हे बॅनर भविष्यात काही संकेत देत आहेत का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


special meeting should be called after pahalgam incident former congress leader kapil sibal request to modi
पहलगाम घटनेनंतर विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे; माजी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचं वक्तव्य

राज्यसभा खासदार आणि माजी काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले की, 'मी पंतप्रधानांना काही सूचना देऊ इच्छितो. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे'.

Ishwari Kuge

पहलगाम घटनेनंतर विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे माजी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचं वक्तव्य

नवी दिल्ली: राज्यसभा खासदार आणि माजी काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले की, 'मी पंतप्रधानांना काही सूचना देऊ इच्छितो. नुकताच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे या घटनेवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे आणि सर्वांकडून सूचना घेतल्या पाहिजेत. कारण देश त्यांच्यासोबत उभा आहे. दहशतवादी हा दहशतवादी असतो, दुसरे काही नाही. दहशतवाद्याला कोणताही धर्म नसतो. सर्वांनी एकमताने हा ठराव मंजूर करून देशाची भावना जगासमोर व्यक्त केली पाहिजे. आपण आफ्रिका, अमेरिका, युरोप, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, रशिया आणि दक्षिण अमेरिका यासारख्या देशांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी खासदारांचे शिष्टमंडळ पाठवले पाहिजे. जेणेकरून आपण त्यांना जागतिक पातळीवरील परिस्थितीबद्दल सांगू शकू. जर आपण हे पाऊल उचलले नाही, तर आपण राजनैतिक दबाव निर्माण करू शकणार नाही', असे काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती केली आहे.

हेही वाचा: श्रीनगरहून 183 पर्यटक महाराष्ट्रात परतले; प्रवाशांसोबत मुरलीधर मोहोळ यांनी साधला संवाद

पत्रकार परिषदेत बोलताना माजी काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले की, 'पाकिस्तानसोबत व्यापार करणाऱ्या सर्व प्रमुख राष्ट्रांना आपण हे सांगायला पाहिजे की जर त्यांचा पाकिस्तानसोबत व्यापार असेल तर त्यांनी आमच्या बाजारपेठेत अजिबात येऊ शकत नाही. ज्या पद्धतीने अमेरिका इतर राष्ट्रांसोबत व्यवहार करतो तसेच तुम्ही देखील करा. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा राहील'.