Thursday, February 12, 2026 08:39:45 AM

'जय महाराष्ट्र'च्या बातमीचा 'इम्पॅक्ट'; उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर कारवाई

उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर पोलिसांची धडक कारवाई. 'जय महाराष्ट्र'च्या बातमीचा मोठा 'इम्पॅक्ट'. विलासराव देशमुख मार्गावरील अतिक्रमणेही. महापालिकेने हटवली.

जय महाराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर कारवाई

लातूर: महाराष्ट्रात तळीरामांची काही कमी नाही. अशातच आता जय महाराष्ट्राच्या बातमीचा मोठा  'इम्पॅक्ट' पाहायला मिळतोय. लातूर शहरातील विलासराव देशमुख मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक  परिसरात रस्त्याच्याकडेला उघड्यावर दारू पिऊन तळीराम धुडघूस घालत असून त्याचा महिला आणि मुलींना नाहक  त्रास सहन करावा लागत असल्याची बातमी 9 फेब्रुवारी रोजी 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीने दाखवली होती.

हेही वाचा: उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या संचालकाकडून महिला शिक्षकांना मारहाण आणि लैंगिक छळ

या बातमीची गंभीर दखल घेत लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. लातूर महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग, लातूर शहर वाहतूक पोलीस दल आणि शिवाजीनगर पोलीस यांनी  संयुक्त कारवाई करत या परिसरातील अतिक्रमणे ही हटवली आहेत. त्यामुळे 'जय महाराष्ट्र'च्या बातमीचा 'मोठा इम्पॅक्ट' पाहायला मिळत असून महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. 

या धडक कारवाईनंतर  शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांच्याशी 'जय महाराष्ट्र' चे प्रतिनिधी अजय घोडके यांनी संवाद साधलाय. दरम्यान 'जय महाराष्ट्र'च्या बातमीचा हा मोठा 'इम्पॅक्ट' पाहायला मिळाला असून उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर पोलिसांची धडक कारवाई केलीय. लातूरच्या विलासराव देशमुख मार्गावरील अतिक्रमणेही महापालिकेने हटवली असून प्रशासनाच्या कारवाईनंतर लातूरकरांमधून समाधान व्यक्त केल जातंय. 
 


bangladesh-election-update-moulvibazar-kamalganj
Bangladesh Violence: बांग्लादेशामध्ये रक्ताची होळी; निवडणुकांच्या आदल्या दिवशी हिंदू तरुणाला निर्घृणपणे संपवलं; हात-पाय बांधलेला मृतदेह सापडल्याने खळबळ

बांग्लादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या (General Elections) मतदानाच्या आदल्या दिवशी हिंसाचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Akshaykumar Bankar

bangladesh violence बांग्लादेशामध्ये रक्ताची होळी निवडणुकांच्या आदल्या दिवशी हिंदू तरुणाला निर्घृणपणे संपवलं हात-पाय बांधलेला मृतदेह सापडल्याने खळबळ

बांग्लादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या (General Elections) मतदानाच्या आदल्या दिवशी हिंसाचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. 11 फेब्रुवारी रोजी मौलवीबाजार जिल्ह्यातील कमालगंज येथील (Kamalganj Upazila) एका चहाबागेत 28 वर्षीय हिंदू तरुणाचा मृतदेह आढळून आला. हात-पाय बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘डेली स्टार’च्या वृत्तानुसार, मृत व्यक्तीची ओळख रतन साहूकार अशी झाली आहे. तो चम्पारा टी गार्डनमध्ये (Tea Garden) काम करत होता आणि इस्लामपूर युनियन परिसरातील रहिवासी होता. स्थानिकांनी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 10 वाजता बागेत त्याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह पाहिला आणि तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

स्थानिकांच्या मते, मृतदेहावर जखमेच्या स्पष्ट खुणा होत्या. काही नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे की हत्या अन्यत्र करून मृतदेह घटनास्थळी फेकण्यात आला असावा. काहींनी या घटनेचा निवडणुकांशी संबंध जोडण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप कोणताही ठोस पुरावा सापडलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: Chandrashekhar Bawankule : राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता NA परवानगीशिवायही मिळणार कामांना गती

रतन यांचे मोठे भाऊ लक्ष्मण कर यांनी सांगितले की, कुटुंबीय रात्रीपासून त्यांचा शोध घेत होते. “आज सकाळी बागेत मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. आम्ही जाऊन ओळख पटवली, मात्र हत्या का झाली, याबाबत काहीच माहिती नाही,” असे त्यांनी सांगितले. कमालगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अब्दुल अवल यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी (Postmortem) मौलवीबाजार सदर रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती दिली असून तपास (Investigation) सुरू असल्याचे सांगितले.

दरम्यान, याच आठवड्यात मैमनसिंह जिल्ह्यातील त्रिशाल उपजिलामध्ये 62 वर्षीय हिंदू व्यापारी सुशेन चंद्र सरकार यांचीही हत्या झाल्याची घटना घडली होती. दुकानातच गंभीर जखमी अवस्थेत सोडून आरोपींनी रोख रक्कम लुटल्याची माहिती आहे. या सलग घटनांमुळे निवडणूकपूर्व सुरक्षेच्या (Election Security) प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. बांग्लादेश प्रशासनाने कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचा दावा केला आहे. 

हेही वाचा: Maharashtra Weather Update: शेतकरी दादा, सावधान! काढणीला आलेल्या पिकांवर पावसाचं सावट; हवामान विभागाचा नवा इशारा