मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगमने पद्म पुरस्काराच्या घोषणेनंतर आपली नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, अलका याज्ञिक, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान आणि किशोर कुमार यांना पद्मश्री पुरस्कार न मिळाल्याबद्दल त्याने चिंता व्यक्त केली. सोनू निगमने याविषयी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि या सन्मानाला लाज वाटली असावी, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली, ज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. मात्र, गायकीच्या क्षेत्रातील काही दिग्गज गायकांचा यादीत समावेश न होण्यामुळे सोनू निगमने खेद व्यक्त केला आहे.
सोनू म्हणाला, "या गायकांचा जगभरातील लोकांसाठी प्रचंड प्रभाव आहे. त्यांची कला प्रेरणादायी आहे आणि त्यांना सन्मान मिळावा लागला पाहिजे." सोनू निगमने खास करून किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांचा उल्लेख केला. "किशोर कुमारांना अजूनही पद्म पुरस्कार मिळालेला नाही आणि मोहम्मद रफी साहेबांनाही फक्त पद्मश्री मिळवण्यात आले," असे सांगत सोनूने सरकारला प्रश्न विचारला, "मरणोत्तर पुरस्कार दिले जात आहेत का?"
सोनू निगमने आपल्या व्हिडिओमध्ये अलका याज्ञिक, श्रेया घोषाल आणि सुनिधी चौहान यांच्याबद्दलही बोलले. "अलका याज्ञिकजींचा इतका मोठा आणि अद्भुत प्रवास आहे. त्यांना अजून सन्मान मिळालेला नाही. श्रेया घोषाल अनेक वर्षांपासून आपली कला सिद्ध करत आहेत, त्यांनाही सन्मान मिळावा," असे सोनू म्हणाला.
सोनू निगमला कधी मिळाला होता पद्मश्री?
हा व्हिडिओ शेअर करताना सोनू निगमने भारत आणि त्याचे प्रलंबित पद्म पुरस्कार विजेते अशी कॅप्शन दिली आहे. सोनू निगमला 2022 मध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सोनू निगमच्या या प्रतिक्रियेमुळे या प्रसिद्ध गायिकांच्या सन्मानाची आवश्यकता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.