नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलली

संतोष परब हल्ल्याप्रकरणी काल सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. तर येत्या १० दिवसांत जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण जाण्याची सूचना न्यायालयाने दिली होती. त्यानुसार, आज नितेश राणे जिल्हा न्यायालयात शरण गेले आहेत. तसेच यावेळी त्यांनी जामिनासाठी पुन्हा अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलली आहे. येत्या सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार आहे.
संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. मात्र, सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र उच्च न्यायालयानेसुद्धा त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालायत धाव घेतली असून याप्रकरणी आज सुनावणी पार पडली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.
काय आहे प्रकरण?
१८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. संतोष परब हे करंजे गावचे माजी सरपंच आहेत. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. याप्रकरणी संशयित आरोपी सचिन सातपुतेला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सचिन सातपुते हा नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असून परिणामी नितेश राणे यांची चौकशी सुरू करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.