Rajnath Singh reaction on Operation Sindoor
Edited Image
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान समोर आले आहे. ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, 'एका अर्थाने आपल्या सैनिकांनी अचूकता आणि मानवता दाखवली आहे. मी सैन्याचे अभिनंदन करतो. आपल्या लोकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांचे तळ सैन्याने उद्ध्वस्त केले आहेत. या काळात कोणत्याही सामान्य नागरिकाचे नुकसान झाले नाही. सैन्याने हनुमानाप्रमाणे हल्ला केला. आम्ही फक्त त्यांना मारले, ज्यांनी निष्पाप लोकांचे जीव घेतले. भारतीय सैन्याच्या शौर्याला मी सलाम करतो. आम्ही हनुमानजींच्या आदर्शांचे पालन केले.'
राजनाथ सिंह यांनी पुढे म्हटलं की, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली सर्व भारतीयांची मान उंचावली आहे. तथापि, संरक्षणमंत्र्यांनी बुधवारी 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 50 बीआरओ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. तत्पूर्वी, काँग्रेसच्या कॅग बैठकीनंतर राहुल गांधी आणि काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनीही ऑपरेशन सिंदूरवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - 'हे' आहेत जगातील 5 सर्वात महागडे लढाऊ विमाने; ऑपरेशन सिंदूरनंतर होत आहे चर्चा
ऑपरेशन सिंदूरद्वारे जगाला मोठा संदेश -
दरम्यान, भारताच्या ऑपरेशन सिंदूरने जगाला एक मोठा संदेश दिला आहे. पाकिस्तानला समजले आहे की आता नवा भारत ही एक अशी शक्ती आहे जी निवडकपणे बदला घेऊ शकते. 2008 आणि आताच्या 2025 मधील भारतामध्ये मोठा फरक आहे. 2008 मध्ये दहशतवाद्यांनी देशाच्या आर्थिक राजधानीत घुसून 166 लोकांची हत्या केली. मात्र, आता भाराताने संरक्षण क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आता भारताने पाकिस्तानचा बदला घेतला आहे.
हेही वाचा - ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान सरकारकडून लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार
भारताने घेतला पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला -
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. हवाई हल्ला करून भारताने पाकिस्तानला चांगलेचं प्रतिउत्तर दिले आहे. आता पाकिस्तानचा भीतीने थरकाप उडाला असून तेथील संरक्षण मंत्र्यांनी शांततेसाठी भारतासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.