मुंबई: न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेने आजारी असलेल्या न्यू इंडिया बँकेत विलीनीकरणासाठी आरबीआयकडे संपर्क साधला आहे. दोन्ही बँकांच्या भागधारकांच्या मान्यतेने हे विलीनीकरण होईल. फेब्रुवारीमध्ये, रिझर्व्ह बँकेने मुंबईच्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेला नवीन कर्ज देण्यावर तसेच 13 फेब्रुवारीपासून 6 महिन्यांसाठी ठेवी आणि पैसे काढण्यावर बंदी घातली होती.
न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा -
रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी पैशांचा गैरवापर केल्याच्या आरोपानंतर कारवाई केली होती. या प्रकरणात 122 कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. तथापी, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बँकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना अटकही करण्यात आली आहे.
हेही वाचा - RailOne App: रेल्वेने लाँच केले नवी अॅप! तिकीट बुकिंगपासून ते रिफंडपर्यंत मिळणार अ
सारस्वत बँका आणि न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक विलिनीकरण -
या विलीनीकरणामुळे ग्राहकांचे पैसे सुरक्षित होतील. प्राप्त माहितीनुसार, सारस्वत बँकेच्या देशभरात 312 शाखा आहेत, तर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 27 शाखा आहेत. या प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही बँकेच्या विलिनीकरणावर 3 महिन्यांपासून काम सुरू आहे. दोन्ही बँकांचे अनेक राज्यांमध्ये अस्तित्व आहे आणि न्यू इंडियाचा मुंबईत मोठा ग्राहक वर्ग आहे.
हेही वाचा - कॅशची झंझट संपली! आता बँकाप्रमाणे पोस्ट ऑफिसही डिजिटल होणार
दरम्यान, सारस्वत बँकेच्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या 8 राज्यांमध्ये 312 शाखा आहेत, ज्यांचा 31 मार्च 2025 पर्यंत एकूण व्यवसाय 91815 कोटी रुपये होता. त्याच वेळी, न्यू इंडियाचा व्यवसाय 3560 कोटी रुपये आहे. तथापि, न्यू इंडिया बँकेच्या मुंबई, पालघर, सुरत, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई येथे अनेक शाखा आहेत.