Sunday, March 08, 2026 12:57:50 PM

India Post GDS Result: इंडिया पोस्ट GDS निकालाची प्रतीक्षा संपणार; 28636 पदांची पहिली मेरिट लिस्ट 'या' दिवशी होणार जाहीर

दहावीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्ट सर्कलनिहाय अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जाईल.

india post gds result इंडिया पोस्ट gds निकालाची प्रतीक्षा संपणार 28636 पदांची पहिली मेरिट लिस्ट या दिवशी होणार जाहीर

नवी दिल्ली: भारतीय टपाल विभागाच्या मोठ्या भरतीकडे लाखो उमेदवारांचे लक्ष लागले असून ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak, GDS) पदांच्या निकालाची प्रतीक्षा आता अधिकच वाढली आहे. तब्बल 28,636 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते आणि सुरुवातीला 28 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र तो पुढे ढकलण्यात आला असून अधिकृत संकेतस्थळावर अद्याप लिंक सक्रिय करण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये उत्सुकतेसोबतच थोडीशी चिंताही दिसून येत आहे.

इंडिया पोस्टकडून (India Post) या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेण्यात आलेली नाही. उमेदवारांची निवड पूर्णपणे दहावीच्या गुणांच्या आधारे तयार होणाऱ्या मेरिट लिस्टवर आधारित असेल. म्हणजेच ज्यांनी दहावीमध्ये उच्च गुण मिळवले आहेत, त्यांना पहिल्या यादीत स्थान मिळण्याची अधिक शक्यता आहे. पहिली मेरिट लिस्ट अधिकृत वेबसाइट www.indiapostgdsonline.gov.in वर सर्कलनिहाय (Circle-wise) PDF स्वरूपात प्रसिद्ध केली जाईल.

या भरती प्रक्रियेत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सर्वाधिक रिक्त पदे आहेत, तर दिल्लीमध्ये तुलनेने सर्वात कमी जागा उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील टपाल सेवा बळकट करण्याच्या उद्देशानेच या भरतीत ग्रामीण सर्कल्सना प्राधान्य देण्यात आले असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे ग्रामीण पार्श्वभूमीतील उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

हेही वाचा: Sanju Samson: इंग्लंडविरुद्धच्या महामुकाबल्यातून संजू सॅमसन बाहेर? 'या' एका चुकीमुळे ICC करू शकते कारवाई

पहिली मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीसाठी (Document Verification) बोलावले जाईल. त्यामुळे उमेदवारांनी आपली दहावीची मूळ गुणपत्रिका, प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे. गुणपत्रिकेतील माहिती आणि अर्जामध्ये दिलेल्या तपशीलात तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.

दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर काही बनावट वेबसाइट्स सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उमेदवारांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरच निकाल तपासावा. एका चुकीच्या क्लिकमुळे वैयक्तिक माहिती किंवा आर्थिक फसवणूक होण्याचा धोका असतो. सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.

इंडिया पोस्टच्या या मोठ्या भरतीचा निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. पहिल्या मेरिट लिस्टमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांना संधी मिळेल, मात्र अंतिम नियुक्ती दस्तऐवज पडताळणीनंतरच निश्चित होईल. त्यामुळे निकालाबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करताना संयम आणि सजगता या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरणार आहेत.

हेही वाचा: TRAI New Directives: "हॅलो, मी बँकेमधून बोलतोय..." म्हणणाऱ्यांची आता खैर नाही; TRAI चा टेलिकॉम कंपन्यांना 'दोन तासांचा' अल्टीमेटम, कंपन्यांवर होणार कारवाई


सम्बन्धित सामग्री