Wednesday, May 21, 2025 01:04:10 PM

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही दक्षिण काश्मीरमध्येच; त्यांना कोणीतरी अन्न, इतर साहित्य पुरवतेय : सूत्र

एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, दहशतवाद्यांकडे 'सर्व काही' असू शकते. म्हणजेच, ते जंगलात लपले आहेत. त्यांना जगण्यासाठी आणि लपण्यासाठी आवश्यक साहित्य मिळतेय. यामुळेच त्यांचा अद्याप शोध लागत नाहीये.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही दक्षिण काश्मीरमध्येच त्यांना कोणीतरी अन्न इतर साहित्य पुरवतेय  सूत्र

नवी दिल्ली: दक्षिण काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी पर्यटकांसह एकूण 26 जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हा हल्ला घडवून आणणारे चार दहशतवादी तेव्हापासून फरार आहेत. त्यांचा अजून शोध लागलेला नाही. लष्कर आणि स्थानिक पोलिसांच्या मोठ्या शोधमोहिमेपासून बचाव करण्यासाठी अजूनही ते आजूबाजूच्या जंगलात लपून राहिलेले असल्याची शक्यता आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेतील सूत्रांनी ही महिती दिली.

एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, दहशतवाद्यांकडे 'सर्व काही' असू शकते. म्हणजेच, त्यांना अन्न आणि आवश्यक साहित्याचा पुरवटा होत असला पाहिजे. ते हे साहित्या घेऊन जात असावेत किंवा त्यांच्याकडे कोणीतरी पोहोचवत असावे. म्हणूनच त्यांना इतके दिवस घनदाट जंगलात लपून राहणे शक्य झाले आहे, हे सहजच स्पष्ट होते.

हेही वाचा - '..पाकिस्तानात जाण्यापेक्षा मेलेलं बरं!' तिथले नागरिक आणि J&K पोलीस दलात 27 वर्षे सेवा? हे कसं घडलं?

शिवाय, हे ठिकाण नियंत्रण रेषेपासून आणि सीमेपासून बरेच दूर असल्यामुळे येथे त्यांना पाकिस्तानकडून कशाचाही पुरवठा होण्याची फारशी शक्यता नाही. त्यांना स्थानिक पातळीवरूनच सर्व काही मिळत असले पाहिजे. भारताने या हल्ल्यासाठी पहिल्यापासूनच पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मदत मिळणे शक्य दिसत नाही.
फेब्रुवारी 2019 मध्ये जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे 40 सैनिक शहीद झाल्यानंतरचा हा देशावरील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. भारतातील अलीकडच्या काळात झालेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याने याचा तपास दहशतवादविरोधी संस्थेने हाती घेतला आहे, .

सुरुवातीच्या चौकशीत असे दिसून आले आहे की, दहशतवादी किमान 48 तासांपूर्वी बैसरन व्हॅलीमध्ये उपस्थित होते. हे पहलगामजवळील एक सुंदर कुरण आणि पर्यटन केंद्र आहे. इथेच हा हल्ला झाला होता.

एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, हल्ल्यानंतर चौकशी केलेल्या ओजीडब्ल्यू म्हणजे ओव्हर ग्राउंड वर्कर्स किंवा दहशतवाद्यांविषयी सहानुभूती असलेल्यांची चौकशी करण्यात आली. त्यांनी सांगितले की, त्यांनी इतर चार ठिकाणांची रेकी केली. यामध्ये अरु आणि बेताब खोऱ्यांचा समावेश होता. परंतु, या सर्व ठिकाणी कडक पहारा होता आणि म्हणून दहशतवाद्यांनी बैसरन निवडले. तेव्हापासून विरोधी पक्षांनी या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रतिबंधक करण्यासाठी लष्कराची उपस्थिती नसल्याबद्दल प्रश्न विचारले आहेत.

गुप्तचर संस्थांचं असं म्हणणं आहे की, दहशतवाद्यांकडे संपर्कासाठी प्रगत उपकरणे होती. काश्मीरमध्ये सेवा बजावलेले निवृत्त संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल यश मोर यांनी हे सूचित केले होते. सूत्रांनी सांगितले की, दहशतलाद्यांनी वापरलेल्या उपकरणांना सिम कार्डची आवश्यकता नव्हती आणि ते कमी अंतराचे एन्क्रिप्टेड ट्रान्समिशन करण्यास सक्षम होते, यामुळे त्यांना  रोखणे अशक्य नसले तरी ते कठीण होते.

दुपारी 1.15 वाजता सुरू झालेल्या हल्ल्यापर्यंत, दहशतवाद्यांनी त्यांचे लोकेशन लपवण्यासाठी आणि भारतीय सुरक्षा दलांना दूर ठेवण्यासाठी तीन सॅटेलाईट फोन वापरल्याचे वृत्त आहे. हल्ल्याची योजना अशी होती - तीन दहशतवादी बैसरनच्या आसपास लपलेल्या ठिकाणांमधून पर्यटकांवर गोळीबार करण्यासाठी आले, तर चौथा आवश्यक असल्यास बॅकअप देण्यासाठी लपून राहिला. सूत्रांनी सांगितले आहे की, जवळपास इतर दहशतवादी देखील लपले असावेत.

साक्षीदारांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला. त्यांना इस्लामिक कलमा पढण्यास सांगितले. हे म्हणू शकले नाहीत, त्यांना ठार केले. हे सर्व पुरुष होते. त्यांना अगदी जवळून गोळ्या घालण्यात आल्या. हल्ल्यानंतरचे भयानक व्हिडिओ लवकरच ऑनलाइन समोर आले, ज्यामध्ये आपले पती आणि सोबत्यांच्या रक्ताने माखलेल्या महिला मदतीसाठी याचना करताना दिसत आहेत. एका दहशतवाद्याने ज्या महिलेच्या पतीला त्याने नुकतेच मारले होते, तिची खिल्ली उडवली आणि म्हणाला, 'जा, मोदींना जाऊन सांग.'

मृत्यू झालेल्या 26 जणांमध्ये एक नेपाळी नागरिक होता. आणखी एक जण हनिमूनवर गेलेला नौदल अधिकारी होता; त्याचे लग्न एका आठवड्यापेक्षा कमी काळापूर्वी झाले होते. आणखी एक जण आंध्र प्रदेशातील 70 वर्षांचा होता. चौथा कर्नाटकातील एका कुटुंबातील 35 वर्षांचा पुरुष होता, जो आपल्याला न मारण्याविषयी विनवणी करत होता.

या हल्ल्यामुळे संपूर्ण जगभरात भीती निर्माण झाली आहे पंतप्रधान मोदींनी केवळ बंदुकींचा वापर करून गोळीबार करणाऱ्यांविरुद्धच नाही तर, हल्ल्याची योजना आखणाऱ्यांविरुद्धही सूड उगवण्याची प्रतिज्ञा केली. दहशतवादाचा दुष्ट हेतू यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असे ते म्हणाले, ज्यामुळे पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवादी नेटवर्कला कडक इशारा मिळाला. दरम्यान, आताही पाकिस्तान सीमेवर वारंवार युद्धबंदी कराराचे उल्लंघन करत आहे.

हेही वाचा - '...मी सुइसाईड बॉम्बर म्हणून पाकिस्तानात जाईन,' कर्नाटकातील मंत्री जमीर खान यांचं वक्तव्य चर्चेत

दहशवादविरोधी लढाईचा भाग म्हणून भारताने पाकिस्तानवर राजनैतिक निर्बंध लावले, ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना देशातून हाकलून लावणे आणि सिंधू पाणी करार निलंबित करणे यांचा समावेश होता. पाकिस्तान कृषीप्रधान राष्ट्र असून आयडब्ल्यूटी हा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा पाणीवाटप करार होता, जो पाकिस्तानला सिंधू नदीचे 80 टक्क्यांहून अधिक पाणी पुरवतो. प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीयांना हाकलून लावले आणि सिमला करार निलंबित केला. दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र देखील बंद केले आहे.

भारताकडूनही लष्करी प्रत्युत्तर देणेही अपेक्षित आहे
बुधवारी पंतप्रधानांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. सूत्रांनी सांगितले की, मोदींनी सशस्त्र दलांना प्रतिहल्ला करण्याची योजना आखण्यास आणि अंमलात आणण्यास हिरवा कंदील दिला.


सम्बन्धित सामग्री