Thursday, March 12, 2026 10:56:57 PM

Sunil Gavaskar Advice: सुनील गावसकरांचा टीम इंडियाला 'मोलाचा' सल्ला; झिम्बाब्वेविरुद्ध 'या' मॅच-विनर खेळाडूची होणार एन्ट्री?

मोठ्या स्पर्धांमध्ये परिस्थितीनुसार संघरचनेत बदल करणे आवश्यक असते, असेही टीम मॅनेजमेंटने नमूद केले आहे.

sunil gavaskar advice सुनील गावसकरांचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला झिम्बाब्वेविरुद्ध या मॅच-विनर खेळाडूची होणार एन्ट्री

नवी दिल्ली: आयसीसी टी20 विश्वचषक 2026 मधील सुपर-8 फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मोठ्या पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत चर्चेला वेग आला आहे. आगामी झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी संघरचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, संघ संतुलित करण्यासाठी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला पुन्हा अंतिम अकरामध्ये स्थान देणे गरजेचे आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलला विश्रांती देत वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली होती. मात्र सुंदरला ना फलंदाजीत प्रभाव पाडता आला, ना गोलंदाजीत अपेक्षित कामगिरी करता आली. त्या सामन्यात भारताला 76 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे संघ संयोजनाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

हेही वाचा: Viral Video: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बीचवर रोमान्स करणं कपलच्या जीवावर बेतलं; भरतीची लाट आली अन्… व्हायरल व्हिडीओ पाहून तुमचाही उडेल थरकाप

गावसकर यांनी सुचवले की झिम्बाब्वे संघात डावखुऱ्या फलंदाजांची संख्या तुलनेने कमी असल्याने अक्षर पटेलचा समावेश भारतासाठी फायदेशीर ठरू शकतो. आवश्यक असल्यास वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहच्या जागी अक्षरला खेळवण्याचाही पर्याय संघ व्यवस्थापनाने विचारात घ्यावा, असे त्यांनी म्हटले. मात्र अर्शदीपने मागील सामन्यात चांगली गोलंदाजी केल्याचेही गावसकर यांनी मान्य केले आणि चांगल्या लयीत असलेल्या खेळाडूला बाहेर ठेवणे सोपे नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अक्षर पटेलला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर टीम मॅनेजमेंटने स्पष्टीकरण दिले आहे. सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट आणि फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी सांगितले की हा निर्णय पूर्णपणे सामन्याच्या रणनीतीवर आधारित होता. मधल्या षटकांतील मॅच-अप लक्षात घेऊन अतिरिक्त फलंदाजाचा समावेश करण्यात आला होता. अक्षर पटेलच्या क्षमतेवर कोणताही प्रश्न नसून तो संघाचा महत्त्वाचा सदस्य असल्याचे प्रशिक्षकांनी स्पष्ट केले.

मोठ्या स्पर्धांमध्ये परिस्थितीनुसार संघरचनेत बदल करणे आवश्यक असते, असेही संघ व्यवस्थापनाने नमूद केले आहे. आता झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कोणत्या संयोजनासह मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुपर-8 फेरीत उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना भारतासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

हेही वाचा: BJP Maharashtra: भाजप कार्यकरणीची नवी 'पॉवरफुल' टीम जाहीर; दिग्गज नेत्यांना मोठी जबाबदारी, पाहा कोणाला काय मिळाले?


सम्बन्धित सामग्री