नवी दिल्ली: अन्य समुद्रांपेक्षा हिंदी महासागराची जलद गतीने तापमानवाढ होत असून येत्या काही दशकांत भारतात उष्णतेच्या लाटा येतील आणि पूरपरिस्थितीलाही तोंड द्यावे लागेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या जागतिक अहवालात सोमवारी देण्यात आला.
हिंदी महासागराची जलद गतीने तापमानवाढ होत असून येत्या काही दशकांत भारतात उष्णतेच्या लाटा येतील आणि पूरपरिस्थितीलाही तोंड द्यावे लागेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या जागतिक अहवालात सोमवारी देण्यात आला. पृथ्वीचे तापमान वाढत असल्याने कोणकोणते जागतिक दुष्परिणाम संभवतील, याबाबतचा संयुक्त राष्ट्रांच्या इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेन्ज चा सहावा अहवाल ‘क्लायमेट चेंज २०२१ – प्रसिद्ध करण्यात आला. त्यात भारताबद्दल गंभीर इशारा देण्यात आला आहे. हिंदूी महासागराच्या तापमानवाढीमुळे समुद्रपातळीत वाढ होऊन किनारपट्टीच्या सखल भागांमध्ये वारंवार तीव्र पूरपरिस्थिती उद्भवेल, असे या अहवालात म्हटले आहे.
भारतासारख्या देशांमध्ये वायूकणांच्या उत्सर्जनामुळे उष्णतेच्या लाटा निर्माण होतात. त्यामुळे वायूकणांचे उत्सर्जन कमी करणे हवेच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचे आहे, उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ होण्याबरोबरच, अतिवृष्टी आणि हिमनद्यांचे वितळणे हेही परिणाम भारतासारख्या देशाच्या बाबतीत संभवतात. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे उष्णकटिबंधीय चक्रीवादळे किनारपट्टय़ांवर पूरपरिस्थिती निर्माण करतील.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना नुकताच…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर टीका…
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चार ते पाच…
७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडला. यावेळी देशाला संबोधित…
देशाचा आज ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज शासकीय कार्यालये,…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणात त्यांनी देशाच्या आशा-आकांक्षा…