Thursday, February 19, 2026 08:57:04 AM

Akola Mahapalika Election : तिळाचे लाडू आणि साड्यांचं वाटप, अकोल्यात मतदारांना 'गूळ' लावण्याचा प्रयत्न?

अकोल्यातील भाजप उमेदवाराने या गैरप्रकारांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. &quotशहरात उघडपणे तिळाचे लाडू आणि साड्यांचे बॉक्स वाटले जात आहेत, तरीही निवडणूक आयोग..&quot

akola mahapalika election  तिळाचे लाडू आणि साड्यांचं वाटप अकोल्यात मतदारांना गूळ लावण्याचा प्रयत्न

Akolal Mahapalika Election : अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रलोभनांचा पाऊस पाडला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर शहरात विविध ठिकाणी तिळाचे लाडू आणि साड्यांचे वाटप मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे आदर्श आचारसंहितेचा उघडपणे भंग होत असून, राजकीय वर्तुळातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः संक्रांतीच्या सणाचा फायदा घेत मतदारांच्या घरापर्यंत भेटवस्तू पोहोचवण्याचे सत्र सुरू असल्याने निवडणुकीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

भाजप उमेदवाराचा संताप: 'निवडणूक आयोग झोपलाय का?'
अकोल्यातील भाजप उमेदवाराने या गैरप्रकारांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. "शहरात उघडपणे तिळाचे लाडू आणि साड्यांचे बॉक्स वाटले जात आहेत, तरीही निवडणूक आयोग मूग गिळून गप्प का बसला आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मतदारांना खोट्या आश्वासनांना बळी पाडण्याचा आणि आमिष दाखवून मते विकत घेण्याचा हा प्रयत्न अत्यंत निंदनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. या संदर्भात काल आणि आज सलग दोन दिवस तक्रार करूनही ठोस कारवाई होत नसल्याने उमेदवाराने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर संशय व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Ajit Pawar on Sinchan Scam: 25 वर्षे शांत असलेले दादा अचानक संतापले, सिंचन प्रकल्पाची किंमत भाजपमुळे वाढल्याचा थेट आरोप; अधिकाऱ्याचं नाव मात्र गुपित

कठोर कारवाईची मागणी आणि प्रशासकीय सुस्तपणा
निवडणूक प्रक्रियेत धनशक्तीचा वापर रोखण्यासाठी भरारी पथके नेमलेली असतानाही अशा भेटवस्तूंचे वाटप रोखण्यात यश आलेले नाही. "जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे," अशी मागणी भाजप उमेदवाराने लावून धरली आहे. मतदारांना प्रलोभने दाखवून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याची टीका त्यांनी केली. अकोल्यातील अनेक प्रभागांमध्ये छुप्या पद्धतीने या वस्तूंचे वाटप सुरू असल्याचे बोलले जात असून, यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

आगामी 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी वातावरण अधिकच तापले आहे. प्रशासनाने जर वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर निवडणुकीच्या निकालावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकांनी संवेदनशील भागांत गस्त वाढवून साड्या आणि लाडूंचे साठे जप्त करण्याची गरज आहे. मतदारांनी देखील अशा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन सुज्ञ नागरिकांकडून केले जात आहे.

हेही वाचा - Mahapalika Election : 'सुविधा नाही तर मतदान नाही,' फलक लावत मतदानावर सामूहिक बहिष्कार, नागरिकांची आक्रमक भूमिका


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या