मुंबई : मुंबई महापालिकेत महापौरपदी विराजमान झालेल्या भाजपच्या रितू तावडे यांनी त्यांच्या पहिल्याच बैठकीत शहरातील अनधिकृतरित्या घुसखोरी करून राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात मोहित हाती घेतली आहे. तसेच पालिकेतर्फे वाटण्यात आलेल्या बोगस जन्म प्रमाणपत्राबाबतही त्यांनी भाष्य केले आहे. आज पालिकेत झालेल्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना रितू तावडे यांनी सांगितले की, जेव्हा मी पदग्रहण केले तेव्हाच सांगितले होते की मुंबईतील अनधिकृत यांच्या विरोधात माझं काम असेल. याचा पाठपुरावा भाजप नेते किरीट सोमय्या सतत करत होते. मुंबईत ज्या पद्धतीने मुंबई महापालिकेचा साडेचार वर्षाचा भोंगळ कारभार होता, ते सगळे प्रश्न किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून विचारण्यात आले आहेत. पालिकेतील विविध वॉर्डतर्फे आतापर्यंत 237 बोगस जन्म प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहेत. ते रद्द करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर त्याचे पालन झाल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. मात्र त्याचे मूळ प्रमाणपत्र अद्याप बांगलादेशींकडून परत घेतले गेलेले नाही. येत्या महिनाभरात तेही परत घेतले जातील.
हेही वाचा : Groom Refused Dowry : 'लक्ष्मी आली, आता हुंडा कशाला?' नवरदेवाने 31 लाख रुपये नाकारून जिंकली मने; लग्नाची जोरदार चर्चा