Tuesday, November 18, 2025 03:26:11 AM

Australia vs India 1st ODI: भारताच्या हाती निराशा! पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खूपच वाईट झाली. रोहित शर्मा चौथ्या षटकात फक्त 8 धावा करून बाद झाला, तर विराट कोहली 8 चेंडूत आपले खातेही उघडू शकला नाही.

australia vs india 1st odi भारताच्या हाती निराशा पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव

Australia vs India 1st ODI: टीम इंडियाला शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली पहिल्या एकदिवसीय सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 7 विकेट्सने जिंकला, ऑस्ट्रेलियाने 21.1 षटकांत 131 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. पावसामुळे सामना प्रत्येकी 26 षटकांवर कमी करण्यात आला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खूपच वाईट झाली. रोहित शर्मा चौथ्या षटकात फक्त 8 धावा करून बाद झाला, तर विराट कोहली 8 चेंडूत आपले खातेही उघडू शकला नाही. कप्तान शुभमन गिलने 18 चेंडूत 10 धावा केल्या.  

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी आणि मिशेल मार्श

अंतिम फेरीत केएल राहुलने 38 धावा केल्या, तर अक्षर पटेलने 31 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीत जोश हेजलवूड, मिशेल ओवेन आणि मॅथ्यू कुह्नमन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. 131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात गडबडीत झाली. दुसऱ्या षटकात ट्रॅव्हिस हेड फक्त 8 धावा करत बाद झाला. त्यानंतर मिशेल मार्श आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी दुसऱ्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी केली. शॉर्टने 17 चेंडूत 8 धावा केल्या.

हेही वाचा - Smriti Mandhana Wedding News: टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधना लग्नाच्या तयारीत; इंदूरच्या पलाश मुच्छलसोबत विवाहबंधनात अडकणार, दिवाळीत ठरला शुभ मुहूर्त

शॉर्ट बाद झाल्यानंतर जोश फिलिप आणि मिशेल मार्श यांनी संघाची सूत्रे हाती घेतली आणि तिसऱ्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. फिलिपने 29 चेंडूत 37 धावा केल्या, तर मिशेल मार्शने सामन्यात सर्वाधिक 46 धावा केल्या. मॅट रेनशॉ 21 धावा करून नाबाद राहिला.

हेही वाचा - India vs Australia ODI 2025 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात कोहली, रोहित गिलची निराशाजनक कामगिरी

गोलंदाजीत भारताचा प्रयत्न

भारताकडून अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. तरीही टीम इंडियाच्या गोलंदाजीला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवता आले नाही. या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर राहिला आहे. भारताला आता पुढील सामन्यांत सुधारणा करावी लागणार आहे. 
 


सम्बन्धित सामग्री