नागपूर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि 'जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी'ने आयोजित केलेला "गाथा विदर्भाची: विकासाची, समृद्धीची" हा विशेष कार्यक्रम विदर्भाच्या समृद्ध इतिहासाचा गौरव करणारा ठरला.
कार्यक्रमात विदर्भाच्या विकासाच्या दिशेने विविध उपक्रमांची माहिती जनतेसमोर मांडण्यात आली. विदर्भाचा इतिहास पुराणकाळातही सापडतो, ज्यात महाभारतातील पांडवांचा अज्ञातवासही विदर्भात झाल्याचा उल्लेख आहे. या कार्यक्रमाचा उद्देश विदर्भाला समृद्धीच्या मार्गाने भारताच्या विकसनशील आलेखात स्थान मिळवून देण्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनतेसमोर याबाबतची माहिती पुरवणे होता.
'थेट, अचूक, बिनधास्त' या घोषवाक्यासह गेली अकरा वर्ष बातमीदारी करणाऱ्या 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीने आयोजित केलेले चर्चासत्र महत्त्वाचे ठरले. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचे विचारमंथन झाले.
विशेष पाहुणे म्हणून कपिल चंद्रयान, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार, अभिनेता भारत गणेशपुरे, सेलिब्रेटी शेफ विष्णू मनोहर, अभिनेता शिव ठाकरे, महेश मोरोणे (डेप्युटी जनरल मॅनेजर मेट्रो), दीपेन अग्रवाल (अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ इंडस्ट्री अँड ट्रेड), वीरेंद्र खरे (आर्किटेक), नरेश बोरकर (सुप्रिटेंडन्ट इंजिनियर, नागपूर मेट्रो) आणि परिणय फुके (आमदार, भाजप) उपस्थित होते.
गाथा विदर्भाची या कार्यक्रमात बोलताना अभ्याक कपिल चंद्रयान म्हणाले कि मिहान ही संकल्पना विमानाद्वारे होणारी मालवाहतूक या विषयाला केंद्रस्थानी धरून मांडण्यात आली. नागपूरातील विदर्भ इकोनोमिक डेव्हलपमेंट काउंसिल ज्याला वेद काउंसिल म्हणतात. वेद काउंसिलकडून सर्वप्रथम ही संकल्पना मांडण्यात आली. त्यांनी २० वर्षांपूर्वी ही संकल्पना मांडली. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा विषय उचलून धरला. युरोप आणि मिडल इस्टकडून येणारी मालवाहू विमाने त्यांना उच्च प्रमाणात इंधन घ्यावे लागते जेव्हा त्यांना ऑस्ट्रेलिया किंवा साऊथ ईस्ट आशियात जावं लागतं. त्यांना जर रीफव्लिंगसाठी मध्यतरी एखादे स्टेशन मिळाले तर ते जास्त माल त्यांच्या विमानांमध्ये घेऊन जाऊ शकतात. त्याचा फायदा त्यांच्या सेक्टरला होईल आणि विमानांच्या देखभाल दुरूस्तीचे केंद्र म्हणून त्याचा फायदा नागपूर ही होईल. त्याचबरोबर नागपूरात स्पेशल इकोनोमिक झोन तयार करण्यात यावा. भारताच्या केंद्रस्थानी असलेलं नागपूर मिहानच्या माध्यमातून बनेल. ही त्यामागची संकल्पना आहे अशी माहिती कपिल चंद्रयान यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला सांगितली.
पुढे म्हणाले, मिहानमुळे रोजगाची संधी उपलब्ध झाली. तसेच शेतकऱ्यांना फायदा होईल. मिहानमध्ये वेगवेगळ्या कौशल्याची गरज आहे. शिपायापासून ते मॅनेजिंग डिरेक्टरप्रर्यंत पोस्ट वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट झाल्या उपलब्ध आहेत. एकूणच रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत.
हा कार्यक्रम विदर्भाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या योजना, प्रकल्प, आणि धोरणांची माहिती देण्यात महत्त्वपूर्ण ठरला. 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीने राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनतेला योग्य माहिती पुरवण्याचा सकारात्मक प्रयत्न केला, ज्यामुळे विदर्भाला भारताच्या विकसनशील आलेखात स्थान मिळवून देण्यासाठी आवश्यक योगदान दिले जाईल.
या चर्चासत्राने विदर्भाच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वाची पायरी उचलली आहे, ज्यामुळे या प्रदेशातील जनतेमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. "गाथा विदर्भाची: विकासाची, समृद्धीची" कार्यक्रम विदर्भाच्या इतिहास, संस्कृती आणि भविष्याच्या विकासाची जाणीव करून देणारा ठरला आहे.