Monday, February 17, 2025 12:55:06 PM

WARDHA FARMER SUICIDE NEWS
वर्धा जिल्ह्यात २ वर्षात २१३ आत्महत्या, ६६ कुटुंबं मदतीपासून वंचित

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. २०२३ ते २०२४ दरम्यान एकूण २१३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

वर्धा जिल्ह्यात २ वर्षात २१३ आत्महत्या ६६ कुटुंबं मदतीपासून वंचित

वर्धा : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. २०२३ ते २०२४ दरम्यान एकूण २१३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यातील १०४ शेतकरी कुटुंबांना मदत मिळाली आहे, तर ६६ शेतकरी कुटुंबं अजूनही मदतीपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबांची परिस्थिती अजून अधिक बिकट झाली आहे.

वर्ध्याच्या जामठा येथील अजय शिंदे हे महिंद्रा फायनान्स, विदर्भ कोकण बँक आणि गावगाड्यातील कर्जामुळे कर्जबाजारी होऊन शेतात विष घेऊन आत्महत्या केली. त्यांची पत्नी ललिता शिंदे यांनी सांगितले की, पतीच्या मृत्यूने त्यांना दोन मुलींच्या शिक्षणाचा आणि घराच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. "महिंद्रा बँकेच्या कर्जाची वसुली करण्यासाठी तगादा लागला आणि शेवटी अजय शिंदे यांना अत्यंत टोकाचं पाऊल उचलावे लागले," असं ललिता शिंदे यांनी सांगितलं.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

शेतकऱ्यांच्या परिस्थितीला लक्षात घेत बाळा माऊसकर, प्रगतिशील शेतकरी, यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि टॅक्समुक्त करून, अनुदानाची शेतकऱ्यांना आवश्यकता असल्याचं सांगितलं. त्यांचा मत आहे की, उत्पादनाच्या मूल्य निर्धारणामुळे आणि शेतकऱ्यांना लागणारे शेती साहित्य अनुदानावर मिळाल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारू शकते.

वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या आणि संबंधित कुटुंबांना मदत मिळवण्याच्या परिस्थितीवर आता सरकारने योग्य धोरणं लागू करावी लागणार आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यासाठी सरकारने कर्जमुक्ती आणि अनुदानांचे अधिकार दिले पाहिजेत, तसेच उत्पादनाला योग्य आधारभूत भाव देणे आवश्यक आहे.

बीड ब्रेकिंग: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार आरोपी केज न्यायालयात हजर


सम्बन्धित सामग्री