मंबईः सद्गुरुच्या ईशा फाऊंडेशनचे सात ब्रह्मचारी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निधी उभारण्याकरिता आज टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. सात सहभागींपैकी, तीन महिला ब्रह्मचारी यांनी 6 किमीच्या 'ड्रीम रन'मध्ये भाग घेतला, तर चार परुष ब्रह्मचारी यांनी संपर्ण 42 किमीची मॅरेथॉन पर्ण केली. स्वामी पाटू (47) यांनी मॅरेथॉन 3 तास 51 मिनिटांत पर्ण केली, तर स्वामी ज्योतिषा (46) यांनी 4 तास 12 मिनिटांत मॅरेथॉन पूर्ण केली. नंगेपाय धावलेले स्वामी पुलक (34) यांनी 4 तास 39 मिनिटांत मॅरेथॉन पर्ण केली, तर स्वामी पर्णम्शा (37) यांनी 5 तास 19 मिनिटांत मॅरेथॉन पूर्ण केली. माँ पुण्य, माँ साकेता आणि माँ भूतेश्वरी यांनी ड्रीम रन यशस्वीरित्या पूर्ण केली.
या मॅरेथॉनद्वारे जमा झालेला निधी तामिळनाडुच्या ग्रामीण भागातील ईशा विद्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विदयार्थी यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळण्यास सहाय्यक ठरेल. या शाळांबद्दल बोलताना, मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले स्वामी पुर्णांशा (37) यांनी सांगितले, "ईशा विदयामधील बहुतेक मुले दुर्गम गावांतन येतात, जिथे दुर्जेदार शिक्षण उपलब्ध नसते. जरी ते शाळेत गेले तरी, ते अनेकदा केवळ नावालाच असते. त्यांचे पालक शिकवणीचा खर्च उचलू शकत नाहीत किंवा घरी त्यांना अभ्यासात मदत करु शकत नाहीत आणि दर्जेदार शिक्षणाशिवाय, ते पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गरिबीच्या चक्रात अडकन राहतात. हे जाणून घेतल्यावर, शाळेत दुर्जेदार शिक्षण दिले जाईल याची खात्री करण्याची एक मोठी जबाबदारी आमच्यावर येते."
या उपक्रमांची अधिक माहिती देताना ते म्हणाले, “नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, आम्ही मुलांना मदत करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये समवयस्क-आधारित शिक्षणाचा समावेश आहे, जिथे वरिष्ठ विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थ्यांना मदत करतात, आणि ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचण येते त्यांच्यासाठी विशेष वर्गाची सोय आहे. आमची शाळा खेडेगावांमध्ये असल्यामुळे, चांगले शिक्षक शोधणे आणि त्यांना टिकवून ठेवणे हे देखील एक आव्हान आहे. यावर उपाय म्हणून, आम्ही आमच्या शिक्षकांना सतत प्रशिक्षण देतो, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण, चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल.”
आपला वैयक्तिक अनुभव सांगताना स्वामी पूर्णाशा पुढे म्हणाले, “ईशा विद्या शाळेला भेट दिलेला माझा पहिला दिवस मला आजही आठवतो. या उपक्रमांमुळे ग्रामीण मुले आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम व्यक्ती म्हणून ज्या प्रकारे घडत आहेत हे पाहून मला निधी उभारण्याची प्रेरणा मिळत राहते. अशा पाठिंब्याशिवाय, त्यापैकी बरेच जण त्याच जुन्या चक्रात अडकून पडले असते.”
एक धावपटू म्हणून स्वतःच्या प्रवासाबद्दल बोलताना ते म्हणाले, "मी यापूर्वी कधीही मॅरेथॉन धावलो नव्हतो, परंतु क्लासिकल हठयोग आणि ध्यानधारणेसह नियमित योगिक सरावांमुळे माझी फुफ्फुसांची क्षमता आणि हृदयाच्या ठोक्यांची स्थिरता सुधारली आहे. ईशामध्ये आल्यापासून मी माझी तिसरी मॅरेथॉन पूर्ण केली आहे.” ईशा विद्या शाळांमध्ये, बहुतेक विद्यार्थी वंचित आणि आदिवासी समुदायांमधून येतात, जिथे शिक्षण, पोषण, स्वच्छता आणि स्थैर्य यांच्याशी संबंधित आव्हाने मोठ्या प्रमाणावर आहेत. शैक्षणिक अभ्यासासोबतच, विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासाला चालना देण्यासाठी योग आणि ध्यान यांचा दैनंदिन शालेय उपक्रमांमध्ये समावेश केला जातो. जवळपास 49 टक्के विद्यार्थी मुली आहेत आणि 60 टक्के विद्यार्थी पूर्ण शिष्यवृत्तीवर शिक्षण घेत आहेत.