Monday, February 10, 2025 06:07:34 PM

Local train will be available in 2 minutes
मुंबईकरांसाठी खूशखबर! आता फक्त 2 मिनिटांत मिळणार लोकल ट्रेन; रेल्वेमंत्र्यांनी केली खास घोषणा

मुंबईतील उपनगरीय लोकल गाड्यांमधील सध्याचा अंतराचा वेळ 180 सेकंद (3 मिनिटे) वरून 120 सेकंद (2 मिनिटे) पर्यंत कमी केला जाईल.

मुंबईकरांसाठी खूशखबर आता फक्त 2 मिनिटांत मिळणार लोकल ट्रेन रेल्वेमंत्र्यांनी केली खास घोषणा
Local Train In 2 Minutes
Edited Image

Local Train In 2 Minutes: मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, आता लोकल ट्रेनचा प्रवास लवकरच आणखी आरामदायी होणार असून दोन गाड्यांमधील वेळेचे अंतरही कमी होणार आहे. यासंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खास घोषणा केली आहे. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, मुंबईतील उपनगरीय लोकल गाड्यांमधील सध्याचा अंतराचा वेळ 180 सेकंद (3 मिनिटे) वरून 120 सेकंद (2 मिनिटे) पर्यंत कमी केला जाईल. याशिवाय, उपनगरीय नेटवर्कवरील नवीन डिझाइन केलेल्या गाड्यांची घोषणा लवकरच केली जाणार असल्याचंही रेल्वेमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. 

लोकल ट्रेनमध्ये वंदे भारत सारख्या सुविधा - 

रेल्वेमंत्र्यांनी पुढे सांगितले की, वंदे भारत गाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या श्रवण, वायुवीजन आणि वातानुकूलन (HVAC) तंत्रज्ञानासह लोकल गाड्यांना चांगल्या सुविधा देण्याचा सरकारचा मानस आहे. हे तंत्रज्ञान बोगींमध्ये 99.99 टक्के बॅक्टेरियामुक्त ऑक्सिजन पुरवते. यासोबतच, सरकार लवकरच डब्यांच्या डिझाइनमध्ये बदल करण्याची योजना आखत आहे. लोकल ट्रेनचा वेग आणि दर्जा सुधारण्यावर सरकार लक्ष केंद्रित करत आहे.

हेही वाचा - चंद्रहार पाटील आक्रमक! महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा कुस्तीगीर परिषदेला परत करणार

मुंबईत 300 किमी नवीन ट्रॅक टाकले जाणार - 

2025 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेसाठी 23,778 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत, जे मागील सरकारांपेक्षा 20 पट जास्त आहे. शहरात सुमारे 300 किलोमीटर नवीन ट्रॅक टाकण्याचे कामही सुरू असल्याचे यावेळी अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले. पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, दररोज चालणाऱ्या 3 हजार सेवांव्यतिरिक्त सुमारे 10 टक्के किंवा सुमारे 300 लोकल ट्रेन सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होतील.

हेही वाचा - IED Blast In Bijapur-Dantewada Border: बिजापूर-दंतेवाडा सीमावर्ती भागात आयईडी स्फोट; 3 जवान जखमी

एमयूटीपी अंतर्गत सुमारे 301 किमी लांबीचे नवीन रेल्वे मार्ग पूर्ण होण्याच्या विविध टप्प्यात आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि परळ, कल्याण आणि आसनगाव, कल्याण आणि कसारा, ऐरोली आणि कळवा आणि बोरिवली आणि विरार (हार्बर लाइन) दरम्यानच्या रेल्वे मार्गांचा समावेश आहे. तथापी, फेडरेशन ऑफ सबर्बन रेल पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले की, रेल्वे प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी प्रथम चालू कामे पूर्ण करावीत. अनेक रेल्वे प्रकल्प आहेत जे संथ गतीने सुरू आहेत. या रेल्वे प्रकल्पाचे काम आधी पूर्ण केले पाहिजेत, अशी भूमिका देशमुख यांनी व्यक्त केली आहे.  
 


सम्बन्धित सामग्री