Monday, May 12, 2025 08:58:48 PM

'पाकिस्तान तर जन्मापासूनच खोटे बोलत आहे,' UNSC मध्ये भारताचा हल्लाबोल

TRF या दहशतवादी संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. यानंतर पाकिस्तानने UNSC मध्ये हा हल्ला TRF ने केलाच नसल्याचे सांगितले. भारताने पाकिस्तानच्या या खोटारडेपणावर खडे बोल सुनावले.

पाकिस्तान तर जन्मापासूनच खोटे बोलत आहे unsc मध्ये भारताचा हल्लाबोल

नवी दिल्ली : पाकिस्तानने UNSC मध्ये दहशतवाद्यांच्या बचावाचा प्रयत्न करताच भारताने यावर खडे बोल सुनावले. TRF या दहशतवादी संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीमध्ये पहलगामवर निवेदन जारी करताना भारताने TRF चा उल्लेख केला. यानंतर पाकिस्तानने हा हल्ला TRF ने केलाच नसल्याचे UNSC मध्ये सांगितले आणि TRF चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. यावर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, टीआरएफने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे आणि एकदा नाही तर दोनदा त्यात सहभागी असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 'द रेझिस्टन्स फ्रंट' या दहशतवादी संघटनेचे समर्थन केले आहे. लष्कर-ए-तैयबाचा सहयोगी असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. परराष्ट्र सचिवांनी गुरुवारी (8 मे 2025) सांगितले की, 'विशेष म्हणजे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीमध्ये पहलगामवर निवेदन जारी करताना, पाकिस्तानने टीआरएफचे नाव समाविष्ट करण्यास विरोध केला.' विक्रम मिस्री यांनी दिल्लीमध्ये एका प्रेस ब्रीफिंगमध्ये ही माहिती दिली.

हेही वाचा - 'अजून पुरावे हवेत का?' पाकिस्तानी झेंड्यामध्ये लपेटून राष्ट्रीय इतमामात दहशतवाद्यांचा अंत्यविधी

विक्रम मिस्री म्हणाले की, टीआरएफने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे आणि एकदा नाही तर दोनदा त्यात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु, जेव्हा भारताने यूएनएससीमध्ये टीआरएफचे नाव घेतले, तेव्हा पाकिस्तानने पहलगाम हल्ल्यात टीआरएफची भूमिका आहे किंवा सहभाग आहे, याला विरोध केला. टीआरएफ ही मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाची एक शाखा आहे.

विक्रम मिस्री म्हणाले, 'जागतिक पातळीवर पाकिस्तानची प्रतिमा दहशतवादाच्या केंद्राची राहिली आहे. हे सिद्ध करणाऱ्या अनेक घटना आहेत आणि केवळ भारतच नाही तर, जगभरातील देशांकडे याचे पुरावे आहेत. अनेक हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे कनेक्शन समोर आले आहे.

विक्रम मिस्री म्हणाले, 'ओसामा बिन लादेनसारखा भयानक दहशतवादी कुठे सापडला आणि त्याला कोणी शहीद घोषित केले, हे मला आठवण करून देण्याची गरज नाही. संयुक्त राष्ट्र आणि अनेक देशांनी बंदी घातलेल्या दहशतवाद्यांनाही पाकिस्तानने आश्रय दिला आहे. गेल्या काही दिवसांत तुम्ही पाहिले असेल की, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्री यांनी स्वतः कबूल केले होते की, पाकिस्तान दहशतवादी गटांना मदत करत आहे.

हेही वाचा - 'अल्लाह हमारी हिफाजत करे', म्हणत पाकिस्तानचे खासदार संसदेतच रडू लागले!

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्काय न्यूज चॅनेलवरील मुलाखतीत कबूल केले की, पाकिस्तान बऱ्याच काळापासून दहशतवाद्यांना मदत करत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर सुरू केले, ज्याचे लक्ष्य पाकिस्तानी भूमीवरून भारताविरुद्ध कट रचणाऱ्या दहशतवादी संघटना होत्या. भारतीय लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हल्ल्यादरम्यान कोणत्याही निष्पाप व्यक्तीला इजा होऊ नये आणि फक्त दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट व्हावेत, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती.

भारताच्या या कृतीमुळे पाकिस्तान चांगलाच हादरला आहे. या निराशेत त्याने भारतातील 15 शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. बुधवारी रात्री, त्यांनी जम्मू, श्रीनगर, जालंधर, भटिंडा सारख्या शहरांमधील लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या सामर्थ्यासमोर त्यांची सर्व शस्त्रे अपयशी ठरली.


सम्बन्धित सामग्री