नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. भारताने पाकिस्तानविरोधात जोरदार सिंहगर्जना केली आहे.. तर पाकिस्तानही जमेल ते बोलून त्याला प्रत्युत्तर देत आहे..
पाकिस्तान सरकार आणि सैन्यप्रमुख सध्या मोठमोठ्या वल्गना करत आहेत. पण पाकिस्तानी सैन्याचा कमकुवतपणा अनेकदा चर्चेत असतो.
पाकिस्तानी सैन्य अनेकदा चुकीच्या कारणांमुळे बातम्यांमध्ये असते. ते केवळ हुकूमशाहीच नाही तर दहशतवादालाही प्रोत्साहन देते. त्यांनी पोसलेल्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतासारख्या देशात अस्थिरता पसरवण्याचे कट रचले जातात. हे देखील एक असे सैन्य आहे जे स्वतःच्या सरकारचा अनादर करते आणि ते हवे तसे काम करते. हे सैन्य पाकिस्तानच्या गरिबीचे एक मोठे कारण आहे. कारण, ते त्यांच्या बजेटच्या 20 टक्क्यांहून अधिक हिस्सा गिळंकृत करते.
पाकिस्तानी सैन्याच्या अनेक बाजूंनी कमकुवतपणा हा सतत चर्चेचा विषय राहिला आहे. ज्यामध्ये अंतर्गत अस्थिरता आहे आणि बंडखोरीची सतत भीती आहे. ते भ्रष्टाचारात बुडालेले आहे. जेव्हा जेव्हा पाकिस्तान सरकार आपल्या शेजाऱ्यांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ते काही ना काही कट रचून ते संबंध बिघडवतात. पाकिस्तानी सैन्याचे हे उपद्व्याप आणि कमजोर बाजू सतत चर्चेचा विषय राहिले आहेत.
हेही वाचा - पाकिस्तानी सैन्याचे मनोबल जमीनदोस्त! मुनीरच्या सैनिक आणि अधिकाऱ्यांसह 600 जणांचे राजीनामे?
1. अंतर्गत अस्थिरता आणि बंडखोरीची भीती
अलीकडच्या काळात, पाकिस्तानी सैन्यात असंतोष आणि अक्षमतेचे अनेक आरोप समोर येत आहेत. अलीकडेच लीक झालेल्या एका पत्रात, कनिष्ठ आणि मध्यम स्तरावरील अधिकाऱ्यांनी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर अक्षमता, भ्रष्टाचार आणि राजकीय बळी घेण्याचे गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे लष्करात बंड होण्याची भीती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती पाकिस्तानी सैन्याच्या एकतेवर आणि शिस्तीवर निश्चितच प्रश्न उपस्थित करते.
2. दहशतवादाविरुद्ध सौम्य दृष्टीकोन
संपूर्ण जग आता पाकिस्तानी लष्करावर दहशतवादाचे जनक असल्याचा आरोप करते. त्यांच्यात दहशतवाद्यांबद्दल केवळ सौम्यताच नाही तर, त्यांना प्रॉक्सी युद्धासाठी पोसले आणि वाढवले जाते. यामुळे नेहमीच सैन्याच्या प्रभावी कारवाई आणि व्यावसायिक शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
3. गैर-लष्करी कार्यात जास्त सहभाग
पाकिस्तानी सैन्य त्यांच्या मुख्य कामाव्यतिरिक्त, अशा अनेक गोष्टी करते ज्यांच्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो किंवा नसला पाहिजे. राजकारण, रिअल इस्टेट आणि अगदी उद्योगांमध्येही पाकिस्तान लष्कराचे पाय पसरलेले आहेत. पाकिस्तानी सैन्य रिअल इस्टेट, फूड चेन आणि अगदी टीव्ही-नाटक निर्मितीसारख्या क्षेत्रात सक्रिय आहे. त्यांच्या स्वतःच्या पाकिस्तानी देशवासीयांनीही त्यांच्या कामावर टीका केली आहे आणि म्हटले आहे की, यामुळेच लष्कराते राष्ट्रीय सुरक्षेवर योग्यरित्या लक्ष नाही किंवा ते केंद्रित करू शकत नाहीत.
4. भ्रष्टाचाराचे आरोप
वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत राहतात. पण त्याच्या एका केसालाही इजा होत नाही. पनामा पेपर्स आणि ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (ओसीसीआरपी) च्या अहवालात अनेक जनरल्सच्या स्विस बँक खात्यांमध्ये लाखो डॉलर्स असल्याचे उघड झाले. या भ्रष्टाचारामुळे सैन्याची विश्वासार्हता कमी होते. जनतेमध्ये असंतोष वाढतो.
5. काश्मीरचा गैरवापर आणि भारतकेंद्रित धोरण
अंतर्गत समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य अनेकदा काश्मीर आणि भारतविरोधी भावनांचा वापर करते. याचे ताजे उदाहरण म्हणजे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांचे अलीकडेच केलेले विधान, ज्यामध्ये त्यांनी काश्मीरला "पाकिस्तानची गळ्याची नस" असे वर्णन केले आहे. यानंतर लगेचच जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ले झाले. असे मानले जाते की पाकिस्तानी सैन्य नेहमीच आपले धोरणात्मक अपयश लपविण्यासाठी असे करते. या उणीवा पाकिस्तानी लष्कराच्या कार्यपद्धती, रणनीती आणि सामाजिक-राजकीय भूमिकेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करतात.
6. सैन्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह
काही अहवाल आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की पाकिस्तानी सैन्यातील सैनिकांचा उत्साह आणि तंदुरुस्तीचा स्तर पूर्वीसारखा राहिलेला नाही. अर्थात या अहवालांची अजून पुष्टी झालेली नाही. एका माजी लष्करप्रमुखाने सांगितले की, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामधील सैनिकांची परिस्थिती बिघडत चालली आहे, ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
गेल्या काही वर्षांत पाकिस्तानी सैन्याच्या प्रशिक्षण आणि आहारावरही विपरीत परिणाम झाला आहे, ज्यामुळे सैनिकांच्या तंदुरुस्तीवर परिणाम होत आहे. काही एक्स पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की पाकिस्तानी सैन्य "आतून पोकळ" आहे.
हेही वाचा - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीची छाया.. हे ट्रेंडस् आणि कीवर्डस सर्वाधिक गुगल सर्च
असेही म्हटले जाते की पाकिस्तानी सैन्याच्या सैनिकांना मिळणारे पोषण आणि वैद्यकीय सहाय्य भारतापेक्षाही वाईट आहे. याचा परिणाम त्यांच्या फिटनेस आणि आरोग्यावर होतो.
दरम्यान, अनेकदा पाकिस्तानच्या क्रिकेट टीमच्या फिटनेसवरही अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच, त्यांना मिळणाऱ्या प्रशिक्षणावरही.. शिवाय, यातील काही मुस्लीम क्रिकेटपटूंचा इतर धर्मीय क्रिकेटपटूंविषयी अनादर आणि दु:स्वासही अनेकदा समोर आला आहे. हीच स्थिती लष्कराचीही असू शकते.