नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी आपल्या पक्षाने व्यक्त केलेल्या चिंतेचा पुनरुच्चार केला. आखाती संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून भारतीयांना घरून काम करण्याचे, परदेश प्रवास टाळण्याचे आणि सोने खरेदी करण्यापासून परावृत्त होण्याचे केलेल्या आवाहनावर चिंता व्यक्त केली. पंतप्रधानांच्या ‘राष्ट्र प्रथम, आरामापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ’ या देशाला दिलेल्या संदेशावर प्रतिक्रिया देताना, काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने वाढत्या आर्थिक दबावाखाली मोदींना ‘तडजोड केलेले’ म्हटले आणि ‘सरकारच्या अपयशामुळे जनतेला त्याग करण्यास सांगितले जात आहे, अशी टीकादेखील राहुल गांधींनी केली.
हेही वाचा : PM Narendra Modi: 'सत्ता समीकरण बदलताच काँग्रेसने डीएमकेच्या पाठीत खंजीर खुपसला'; काँग्रेस-डीएमके वादावर पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जनतेला सोने खरेदी, पेट्रोल, इंधन वापराबाबत काही सूचना केल्या होत्या. मोदीजींनी जनतेला त्याग करायला सांगितले. सोनं खरेदी करू नका, परदेश प्रवास करू नका, पेट्रोलचा वापर कमी करा, खते आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा, मेट्रोचा वापर करा आणि घरून काम करा. हे केवळ सल्ले नाहीत, हा अपयशाचा पुरावा आहे," असे ट्विट राहुल गांधी यांनी केले. दिवसाच्या सुरुवातीला, राहुल यांच्या पक्षाचे खासदार कार्ती चिदंबरम यांनीही या सतर्कतेमागील 'कारणे' काय होती, असा प्रश्न उपस्थित केला आणि विरोधी पक्षांना तसेच उर्वरित देशाला 'खऱ्या परिस्थिती'बद्दल माहिती देण्यासाठी मोदी सरकारने संसदेचे तात्काळ अधिवेशन बोलवावे, असे आवाहन केले. “@PMOIndia कडून आलेले हे अत्यंत गंभीर ‘निर्देश’ आहेत. यामागे काय कारण आहे? सरकारने तात्काळ संसदेचे अधिवेशन बोलावून, देशाला विश्वासात घेऊन, या ‘विनंत्यां’ची गरज का भासली आहे, याबद्दलची खरी परिस्थिती आम्हाला कळवावी,” असे त्यांनी ट्विट केले.