Thursday, May 15, 2025 08:34:16 AM

राज्य स्थापनेपासून 10 नेते उपमुख्यमंत्रीपदी विराजमान

राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्रीपदावर आतापर्यंत 10 नेत्यांची वर्णी लागली आहे.

राज्य स्थापनेपासून 10 नेते उपमुख्यमंत्रीपदी विराजमान

मुंबई : राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्रीपदावर आतापर्यंत 10 नेत्यांची वर्णी लागली आहे. यातील देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही नेता मुख्यमंत्री होवू शकला नाही. अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून तब्बल पाच वेळा शपथ घेतली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा एक वेगळा विक्रम केला आहे.

 

उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले नेते

 

नासिकराव तिरपुडे - (5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978)

सुंदरराव सोळंके  - (18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980)

रामराव आदिक (2 फेब्रुवारी 1983 ते 5 मार्च 1985)

गोपीनाथ मुंडे - (14 मार्च 1995 ते 11 ऑक्टोबर 1999)

छगन भुजबळ -(18 ऑक्टोबर 1999 23 डिसेंबर 2003)

विजयसिंह मोहिते-पाटील - (27 डिसेंबर 2003 ते 19 ऑक्टोबर 2004)

आर.आर.पाटील - (1 नोव्हेंबर 2004 ते 1 डिसेंबर 2008)

छगन भुजबळ -  (8 डिसेंबर 2008 ते 10 नोव्हेंबर 2010)

अजित पवार - (10 नोव्हेंबर 2010 ते 25 सप्टेंबर 2012)  

 (25 ऑक्टोबर 2012 ते 26 सप्टेंबर 2014)

(23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019)    

( 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022)

(2 जुलै 2023 ते आत्तापर्यंत) 

 

मुख्यमंत्रीपद भूषवललेले देवेंद्र फडणवीस हे एकमेव नेते आहेत. 

 


सम्बन्धित सामग्री