Thursday, May 15, 2025 12:34:03 AM

'कर भला तो हो भला;' उघडे मॅनहोल ठीक करणाऱ्या व्यक्तीसोबत घडला चमत्कार!

स्कूटरवरून जाणाऱ्या एका माणसाच्या ते लक्षात आले. पण तो तसाच पुढे निघून गेला. मग, दुसरा माणूस पुढे आला. वेळ वाया न घालवता त्याने मॅनहोलचे झाकण पुन्हा योग्य ठिकाणी ठेवले. हे काम पूर्ण होताच...

कर भला तो हो भला उघडे मॅनहोल ठीक करणाऱ्या व्यक्तीसोबत घडला चमत्कार

Spread Positivity : रस्त्यात मोठा दगड पडलेला असल्यामुळे किंवा मोठा खड्डा असल्यामुळे, मॅनहोलचे झाकण उघडे राहिल्यामुळे अनेक अपघात होतात. त्यांच्यापैकी काही अपघात प्राणघातक ठरू शकतात, हे आपल्याला माहिती आहे. अनेक निष्पाप लोकांना तर, काही वेळेस लहान मुलांनाही अशा अपघातात जीव गमवावा लागला आहे.

अशाच मॅनहोलचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या मॅनहोलचे झाकण उघडे राहिले होते. स्कूटरवरून जाणाऱ्या एका माणसाच्या ते लक्षात आले. पण तरीही तो दुर्लक्ष करून तसाच पुढे निघून गेला. यानंतर मग, दुसरा माणूस पुढे आला. वेळ वाया न घालवता त्याने मॅनहोलचे झाकण पुन्हा योग्य ठिकाणी ठेवले. हे काम पूर्ण होताच, तो माणूस आधी जिथे उभा होता तिथे एक विजेचा खांब पडला. जर, तो मॅनहोलवर झाकण व्यवस्थित ठेवायला गेला नसता, तर तो खांब थेट त्याच्यावर पडला असता.

हेही वाचा - हृदयस्पर्शी! एका वडिलांची पोस्ट व्हायरल; 'हे मुलींचे संगोपन नाहीये, ही तर शांती ठेवून क्रांती आहे...'

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. @IM_esha_ या हँडलवरून X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये, हा व्हिडिओ कुठे आणि केव्हा बनवला गेला याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. परंतु एक बाब यातून समोर येते की, चांगल्या कर्मांचे नेहमीच चांगलेच फळ मिळते. आपल्या कर्माचा परिणाम आपल्याला आज ना उद्या मिळतातच. हा व्हिडिओ याचा पुरावा आहे की जर तुम्ही चांगले केले तर तुमचेही चांगले होईल.

अपघात टाळण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी आपण नेहमी पुढे आलं पाहिजे. आपल्या सतर्कतेमुळे आणि थोडासा वेळ दिल्यामुळे मोठा धोका टळू शकतो. कुणाचा तरी जीव वाचू शकतो. आपल्या एखाद्या चांगल्या कृतीमुळे एखाद्याचा जरी जीव वाचला, तरी ती खूप मोठी गोष्ट आणि खूप मोठे यश ठरेल. शिवाय, माणूस म्हणून माणुसकी जपणे, ही आपली जबाबदारी आहेच..

कर्माचा सिद्धांत
कोणत्याही कर्माचे फळ हे असतेच.. मग ते कर्म चांगले असो, वाईट असो की सर्वसाधारण.. आपण कर्म केल्यानंतर योग्य त्या वेळी त्याचे फळ आपल्याला मिळते. कोणत्या कर्माचे कोणते फळ कोणत्या वेळी कशा स्वरूपात मिळेल, हे ठरवण्याचा अधिकार जगन्नियंत्या परमेश्वराचा असतो. काही कर्मांची फळे लगेच मिळतात तर, काहींची बऱ्याच काळाने. यामुळे अनेकदा हा कर्माचा सिद्धांत आपल्याकडून विसरला जातो. मात्र, केलेल्या कर्माचे फळ चुकतही नाही आणि टळतही नाही. तेव्हा, प्रत्येक कर्म करताना हा सिद्धांत लक्षात ठेवणे चांगले..

हेही वाचा - VIDEO: निषेधासाठी रस्त्यावर लावलेला पाकिस्तानी झेंडा काढण्याचा मुस्लीम विद्यार्थिनीचा प्रयत्न; शाळेतून हकालपट्टी


सम्बन्धित सामग्री