Tuesday, November 18, 2025 09:14:37 PM

Tulsi Vivah 2025: आज तुळशी विवाह पार पडल्यानंतर ‘ही’ एक गोष्ट नक्की करा; घरात भरभराट होईल आणि नांदेल सुखसमृद्धी

कार्तिक द्वादशीला तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावला जातो. आज तुळशी विवाहानंतर शांत बसून भावपूर्वक तुळशी चालीसा पठण केल्यास घरातील ऊर्जा अधिक शुभ आणि सकारात्मक राहते, अशी श्रद्धा आहे.

tulsi vivah 2025 आज तुळशी विवाह पार पडल्यानंतर ‘ही’ एक गोष्ट नक्की करा घरात भरभराट होईल आणि नांदेल सुखसमृद्धी

Tulsi Vivah 2025: कार्तिक महिन्यातील द्वादशी हा दिवस हिंदू पंचांगात खूप शुभ मानला जातो. कारण या तिथीला तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी आणि काही ठिकाणी विष्णू अवतार भगवान शालीग्रामाशी लावला जातो. अनेक घरी हा विवाह अगदी बारकाईने पार पडतो. महिलांसाठी हा दिवस पवित्र आणि आनंददायी असतो. पिढ्यान्‌ पिढ्या चालत आलेल्या या रितीमध्ये खूप भावनिकता आणि श्रद्धा असते. तुळस हे फक्त रोप नाही भारतातील घरांमध्ये तुळस लक्ष्मीस्वरूपा मानली जाते. त्यामुळे तुळशी विवाह करण्यामध्ये भक्ती, साजरीकरण, मंगल भावना आणि घरातील सकारात्मकता या सर्वांचा एक सुंदर संगम असतो.

या दिवशी तुळशीला साडी नेसवली जाते, बंधन बांधलं जातं, दिवे लावले जातात आणि पारंपारिक पद्धतीने साखर, धान्य, नारळ, फुले यासह विवाह विधी पार पडतो. हे सगळं करताना कोणालाही कुठली बंधने नसतात; उलट मनापासून भाव असतो की घरातील तुळस आज खरोखर दैवी वधू आहे. आजच्या दिवशी विशेषत: स्त्रिया वधू-वर नात्यासारखीच भावना मनात ठेवून तुळशीसमोर प्रार्थना करतात की घरात सौहार्द, शांती, प्रेम, आणि समृद्धीने जीवन चालावं.

असं मानलं जातं की तुळशी विवाह केल्याने घरातील अडथळे कमी होतात आणि विशेषत: विवाहयोग लवकर प्रबळ होतो. ही एक धार्मिक श्रद्धा आहे आणि अनेक कुटुंबांमध्ये आजही ही श्रद्धा खोलवर टिकून आहे. म्हणूनच याच दिवशी ‘तुळशी चालीसा’ पठण करण्याची परंपरा आजही कायम आहे. तुळशी चालीसा म्हणजे फक्त मंत्र किंवा पान्यांची वचने नव्हे; तर तुळशीच्या दिव्यत्वाची स्तुती आणि स्मरण.

आज तुळशी विवाह केल्यानंतर एक गोष्ट बहुतेक घरी परंपरेने केली जाते  ती म्हणजे तुळशीसमोर शांत बसून मंत्रपठण, चालीसा आणि प्रार्थना. अनेक विधी नंतर लोक लगेचच घरकामात किंवा मोबाइलमध्ये लक्ष देतात. पण आजचा दिवस विशेष आहे म्हणून किमान काही मिनिटे तरी तुळशीसमोर ध्यानसारखं स्थिर बसणं, भावपूर्वक चालीसा किंवा मंत्र म्हणणं; याला खूप महत्त्व मानलं जातं. 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
 


सम्बन्धित सामग्री