छत्रपती संभाजीनगर : लग्नातील जेवणातून 600 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बालकाचा मृत्यू झाला असून 17 जणांची प्रकृती गंभीर आहे. छत्रपती संभाजीनगरातील कन्नड तालुक्यातील अंबाळा-ठाकूरवाडीतील ही घटना आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील अंबाला येथे ठाकर समाजातील आठ जोडप्यांचा सामूहिक विवाह संपन्न झाला होता. दरम्यान या विवाहासाठी आलेल्या विविध गावातील जवळपास 500 ते 600 जणांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत सुरेश गुलाब मधे नावाच्या आठ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : 'जय श्रीराम'च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे 800 यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
विषबाधा झालेल्या गंभीर रुग्णांवर छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून इतर रुग्णांवर करंजखेडासह इतर आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत. लग्न सोहळा पार पडल्यानंतर सर्व वऱ्हाडयांना अचानक उलटी व चक्कर यायला सुरुवात झाली. यामुळे परिसरातील खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात रुग्ण दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
छत्रपती संभाजीनगरात लग्नातील जेवणातून लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामुळे 600 लोकांच्या जीवावर बेतल आहे. लग्नातील जेवण खाल्ल्याने आठ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. सुरेश गुलाब मधे असे या बालकाचे नाव आहे. तर 17 लोकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विषबाधा झालेल्या लोकांवर छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालय, करंजखेड्यातील रुग्णालय आणि इतर आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र विषबाधा कशी झाली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.