Thursday, May 15, 2025 12:09:10 AM

अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप

अश्विनी बिद्रे यांच्या हत्येच्या खळबळजनक प्रकरणाचा आज सोमवारी (दि. 21)  निकाल जाहीर झाला आहे .

अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप

कोल्हापूर:  जिल्ह्यातील आळते गावातील सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येच्या खळबळजनक प्रकरणाचा आज सोमवारी (दि. 21)  निकाल जाहीर झाला आहे . मुख्य आरोपी अभय कुरुंदकर जो एकेकाळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक होता याला पनवेल सत्र न्यायालयाने दोषी ठरवले असून, त्याच्यासोबत कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर यांनाही न्यायालयाने शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज सकाळी 11वाजता या तिघांची अंतिम शिक्षा जाहीर झाली आहे. दरम्यान, आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप असा पनवेल सत्र न्यायालयाचा निकाल लागला आहे. तर महेश फळणीकर कुंदन भंडारीची सात वर्षांची शिक्षा पूर्ण 

या गुन्ह्याने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण पोलिस दलालाही हादरवले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, बिद्रे यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी शरीराचे तुकडे करून फेकण्यात आले. मुख्य आरोपी कुरुंदकरला हत्या आणि अपहरण प्रकरणी दोषी ठरवले असून, भंडारी व फाळणीकर या दोघांना पुरावे नष्ट केल्याबद्दल शिक्षा ठोठावली जाणार होती आणि ती शिक्षा काय असणार यावर अखेर निर्णय घेण्यात आला आहे. 


आज सकाळी10 वाजण्यापूर्वी आरोपींना बंदोबस्तात पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर 11 वाजता पनवेल सत्र न्यायालयाचा अंतिम निर्णय झाला. 

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण

पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे, ज्यांचे पूर्ण नाव अश्विनी राजू गोरे होते, 15 एप्रिल 2016 रोजी नवी मुंबईतील कळंबोली परिसरातून अचानक बेपत्ता झाल्या. त्यांच्या अचानक गायब होण्यामागे वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांचा हात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला. याशिवाय, पोलीस प्रशासन या प्रकरणाच्या तपासात सुरुवातीला सहकार्य करत नसल्याची तक्रारही कुटुंबियांनी केली होती.

अश्विनी यांचा विवाह 2005 साली हातकणंगले येथील राजू गोरे यांच्याशी झाला. विवाहानंतर एका वर्षात त्यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले. सुरुवातीला पुणे आणि नंतर सांगली येथे त्यांची नियुक्ती झाली. याच काळात त्यांची ओळख सांगलीतील पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्याशी झाली आणि त्यांच्यात जवळीक वाढली. 2013 साली अश्विनी यांना पदोन्नती मिळाल्यावर त्या रत्नागिरी येथे कार्यरत झाल्या, आणि कुरुंदकर त्यांना वारंवार भेटायला येत असे. यामुळे घरच्यांना संशय आला आणि नंतर कुरुंदकर व अश्विनी यांच्यात सतत वाद सुरू झाले. कुरुंदकरने अश्विनीला गायब करण्याची धमकी दिल्याचे तिच्या पतीने सांगितले. 2015 मध्ये अश्विनी यांची बदली कळंबोली येथे झाली, परंतु त्या तिथे हजरच झाल्या नाहीत. यानंतरच कुटुंबीयांना त्यांचे बेपत्ता होणे लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.
 


सम्बन्धित सामग्री