मुंबई: राजकीय वर्तुळात नेहमीच नवनवीन चर्चाना उधाण येतं असतं. याच पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस पुढच्या 2034 सालापर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर माध्यमांशी संवाद साधताना प्रतिनिधींनी याबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान फडणवीस म्हणाले 'बावनकुळे यांच्या हातात असले तर ते आगामी 100 वर्षे मलाच मुख्यमंत्री म्हणून ठेवतील. पण त्यांच्या शुभेच्छांचा आपण मतीतार्थ समजून घ्यावा. त्यांनी माझ्या चांगल्यासाठीच मला या शुभेच्छा दिल्या आहेत,' असा अर्थ त्यांनी बावनकुळे यांच्या विधानाचा लावला.
त्याचबरोबर फडणवीस म्हणाले राजकारणात भूमिका बदलत असतात आणि या भूमिका बदललल्या गेल्याच पाहिजेत. कोणी कोणत्या पदावर दीर्घकाळ राहत नाही त्यामुळे भूमिका बदलायची तेव्हा बडलेलंच त्यामुळे भविष्यात माझीही बदलेल किंवा काहीही होऊ शकतं असं फडणवीस यांनी सांगितलं.
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले होते?
चंद्रशेखर बावनकुळे हे एका सभेत बोलत होते. या सभेत बोलत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्रिपद यावर भाष्य केलं. फडणवीस हे 2034 सालापर्यंत मुख्यमंत्रिपदावर कायम राहणार आहेत. फडणवीस यांचा विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी असल्याशिवाय विकसित महाराष्ट्राचा संकलप पूर्ण होऊ शकत नाही. देवेंत्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वात आपल्याला पुढे जायचे आहे, असं बावनकुळे म्हणाले होते.
दरम्यान बावनकुळेंनी केलेल्या मुख्यमंत्रीपद विधानावर एकनाथ शिंदेंना विचारले असता त्यांनी एकही शब्द न उच्चारता फक्त हात झोडले आणि आपली प्रतिक्रिया दिली.