राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर आता तपासाला वेग आला आहे. असं असताना अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. VRS या विमान वाहतूक कंपनीच्या उड्डाणांवर बंदी घालण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. डीजीसीएने लेअरजेट 40-45 मॉडेलच्या 4 विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतर कंपनीच्या विमानाचे विशेष ऑडिट करण्यात आले होते. नागरी विमान वाहतूक महासंचलनालयाने केलेल्या परीक्षणाअखेर ही पहिली मोठी कारवाई केली आहे. यामध्ये VT - VRA, VT - VRS, VT - VRV आणि VT - TRI या चार विमानांवर बंदी घातली आहे.