Thursday, May 15, 2025 12:12:54 AM

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांचे पार्थिव मुंबईत विमानतळावर आणले

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणातील मृतांचे पार्थिव मुंबईत आणले आहेत. पहलगाममधील बैसरन परिसरात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांचे पार्थिव मुंबईत विमानतळावर आणले

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणातील मृतांचे पार्थिव मुंबईत आणले आहेत. पहलगाममधील बैसरन परिसरात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात  महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आणि आता मुंबई विमानतळावर मृतांचे पार्थिव आणले आहेत. 

काश्मीरच्या शांत डोंगरदऱ्यांमध्ये पर्यटकांसाठी स्वर्ग मानल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये अलीकडेच घडलेला दहशतवादी हल्ला संपूर्ण देशाला हादरवून गेला. ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन परिसरात 6 अतिरेक्यांनी अचानक गोळीबार करत पर्यटकांना लक्ष्य केले. हल्लेखोरांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात काही विदेशी पर्यटकांसह महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

हेही वाचा : जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ला; मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष

राज्यातील 6 पर्यटकांचा मृत्यू 
जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. यात डोबिंवलीतील तीन पर्यटकांचा समावेश आहे. अतुल मोने, संजय लेले, संजय जोशी अशी डोंबिवलीतील पर्यटकांची नावे आहेत. पुण्यातील दोन पर्यटक आहेत. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे अशी त्यांची नावे आहेत. तर पनवेलमधील एकाचा समावेश असून त्यांचे दिलीप देसले आहे. 


सम्बन्धित सामग्री