Tuesday, May 20, 2025 04:33:40 PM

दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेत गुलाल आणि खोबऱ्याची उधळण

कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथे असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र पुन्हा एकदा भक्तिमय उत्साहात रंगलं. यावर्षी, 12 एप्रिल रोजी या भक्तिमय उत्सवाची सुरुवात झाली.

दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेत गुलाल आणि खोबऱ्याची उधळण

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथे असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र पुन्हा एकदा भक्तिमय उत्साहात रंगलं. चैत्र पौर्णिमेच्या मुहूर्तावर दरवर्षी एप्रिल महिन्यात जोतिबा देवाची चैत्र मोठ्या उत्साहात भरते. यावर्षी, 12 एप्रिल रोजी या भक्तिमय उत्सवाची सुरुवात झाली. या यात्रेमध्ये महाराष्ट्रासोबतच, कर्नाटका, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांतून लाखो भाविक सहभागी होतात आणि 'ज्योतिबाच्या नावानं चांगभलं' अशी जयघोषणा करत गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करतात. गुढीपाडवा संपताच जोतिबा डोंगरावर यात्रेचा उत्साह दिसू लागतो, हलगी, पिपाणी आणि सनईच्या सुरांवर नाचणाऱ्या सासनकाठ्यांनी हा परिसर अक्षरशः न्याहाळून जातो. चला तर जाणून घेऊया हा उत्सव कोणत्या कारणासाठी साजरा केला जातो याबद्दल. 

ज्योतिबा यात्रेमागील कथा:

कोल्हासुर नावाच्या राक्षसाचा पराभव केल्यानंतर, देवी लक्ष्मी यांनी त्याची शेवटची इच्छा मान्य केली आणि कोल्हापूर या ठिकाणी स्थायिक झाले. यानंतर, त्यांनी चारही दिशांसाठी चार रक्षक नेमले. देवी लक्ष्मी यांनी ज्योतिबा देव यांना दक्षिण दिशेचे रक्षक म्हणून नेमले. तेव्हापासून ते आजही ज्योतिबा देव दक्षिण दिशेचे रक्षण करत आहेत. मान्यतेनुसार, ज्योतिबा देव यांना केदारनाथचा अवतार मानले जाते, ज्यांनी रत्नासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. सासन काठी हे राक्षसाच्या पत्नीच्या मुक्ततेचे प्रतीक आहेत. अशी मान्यता आहे की ज्योतिबा देव हे महादेवांचे अवतार आहेत. या भागातील आणखी एक समजुती अशी आहे की ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे एकत्रित अवतार आहेत.

चैत्र ज्योतिबा यात्रेत उधळला जातो 'गुलाल':

या चैत्र ज्योतिबा यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे ज्योतिबा देव यांची निघणारी पालखी. जेव्हा जोतिबा देव यांची पालखी निघते, तेव्हा सर्वत्र 'गुलाल' उधळला जातो आणि संपूर्ण परिसर गुलाबी रंगात बदलतो. त्यासोबत या यात्रेचे आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे, या यात्रेमध्ये सुमारे 50 फूट लांबीच्या सासन काठ्यांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. अनेक भक्त 'जोतिबाच्या नावानं चांगभल' या नावाने जयघोष करतात. एक महत्त्वाचा विधी म्हणजे, मंदिरातील कालभैरव मूर्तीसमोर नारळ फोडली जाते.

भक्तांची इच्छा पूर्ण करणारा देवता म्हणून ज्योतिबा देव यांची ओळख:

मान्यतेनुसार, या मंदिरात आल्यावर जेव्हा भाविक त्यांची इच्छा ज्योतिबा देव यांच्यासमोर व्यक्त करतात, तेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होते. या मंदिरात मांडलेल्या सर्व इच्छा आणि मनोकामना ज्योतिबा देव यांच्या आर्शीवादाने पूर्ण होतात. भाविकांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर, ते या मंदिरात येतात आणि नवस पूर्ण करतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री