Thursday, May 22, 2025 10:05:58 PM

Chhatrapati Sambhajinagar: विहीरी आटल्या! घसा कोरडा, भीषण पाणी टंचाई

पाहुण्यांनो या 'जेवण करा पण पाणी माघु नका' जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी चक्क तुमच्या घरी जा अशी म्हणण्याची वेळ छत्रपती संभाजीनगरच्या कोनेवाडी या गावावर आली आहे.

chhatrapati sambhajinagar विहीरी आटल्या घसा कोरडा  भीषण पाणी टंचाई

विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर:

छत्रपती संभाजीनगर:
पाहुण्यांनो या 'जेवण करा पण पाणी माघु नका' जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी चक्क तुमच्या घरी जा अशी म्हणण्याची वेळ छत्रपती संभाजीनगरच्या कोनेवाडी या गावावर आली आहे.  यंदा हिवाळा संपुन फक्त एक महिना संपला तरच उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असताना पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. कोनेवाडी परिसरातील संपुर्ण विहीरी आटल्या असल्याने नागरिकांचे घसे कोरडे पडल्याची वेळ आली आहे, आज कोनेवाडी हे गाव विकतच्या टँकरच्या भरवशावर आहे.

कोनेवाडीच्या काही अंतरावर सोमठाणा येथील  धरण आहे. 'धरण उशाला आणि कोरड घशाला' अशी म्हणण्याची वेळ आली आहे. यावर्षी पावसाळ्या मध्ये कोनेवाडी परिसरात एक ही समाधान कारक पाऊस पडला झाल्याने येथे पावसाळा संपताच भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असुन हंडाभर पाण्यासाठी येथील महिलांना हाताचे काम धंदे सोडुन राणोमाळ भटकंती करुन ही पिण्याचे पाणी आणुन आपली तहान भागवावी लागत आहे. 

कोनेवाडी हे गाव २३०० हजार लोकसंख्या आहे. कोनेवाडील नागरिकांना तब्बल महिनाभर पाण्याविना राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आडुळात चक्क."जेवण करून जा पण पाणी नका मागु" अशी एक नवीन म्हण गावात प्रचलित झाली आहे. कोनेवाडी येथे पाणीटंचाईंने महिला त्रस्त झाल्या आहेत येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करावा लागत आहे.
कोनेवाडीत पाणी टंचाई ही पाचवीला पुजलेली आहे. गावात पाणी वाचवण्यासाठी महिलांनाकडुन अनोखी शक्कल लढवली जात आहे. या गावातील महिला पाण्याची बचत हो यासाठी चक्क लहान बालकांना भाजी वरती आंघोळ घालून तेच पाणी पुन्हा उपयोगी आणत आहे. संसाराच्या आर्थिक नियोजनातून सर्वात जास्त पिण्याच्या पाण्यावर महीलाचा खर्च होत आहे. दररोज पैसे खर्च करावे लागते आर्थिक गणित कोलमडले आहे सरकार आमच्याकडे लक्ष देणार का असे प्रश्न या ठिकाणच्या महिलांनी उपस्थित केला.

हेही वाचा:  Maharashtra Budget 2025: हा बोगस अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका

गावामध्ये पाणी टंचाई नसल्याने चक्क पाणी आणण्यासाठी शाळकरी मुलांनाही आता डोक्यावरती हंडा घेण्याची वेळ या गावातील विद्यार्थ्यांवरती आली आहे. आम्हाला शाळा सोडून पाणी आणण्यासाठी घरी राहवावे लागते. याचाच फटका आमच्या अभ्यासक्रमावरती होत असल्याचे दिसून येते आहे.

महिनाभरापासून भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने यामुळे घरातील लहान सदस्य जे आहेत. त्यांना आठवडा भर विना आंघोळीचे राहावे लागत आहे तर काही जण आंघोळ करतांना आंघोळीचे पाणी खाली टोपल्यात धरून तेच पाणी कपडे धुण्यासाठी वापरत आहे. दररोज ७० रुपये प्रति ड्रम व पाच रुपये प्रति हंडा दराप्रमाणे पिण्याचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत असल्याने आमचे नाकी नऊ येत आहे. पैसे खर्च करून देखील पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नसल्याने येथील कायमचा पाणी प्रश्न केंव्हा सुटेल ? कोनेवाडीमध्ये गेल्या अनेक वर्षापासुन बारामाही भिषण पाणी टंचाई असते माञ लोकप्रतिनिधी सह प्रशासन या गंभीर समस्येकडे दुलर्क्ष करीत असल्याने येथील पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. या पाणीटंचाई कडे सरकार किती गंभीर्याने लक्ष देईल हे पाहणं देखील आता महत्त्वाचा ठरणार आहे


 


सम्बन्धित सामग्री