बुलढाणा जिल्ह्यात पार पडलेल्या पदाधिकारी प्रशिक्षणादरम्यान आमदार अर्जुन खोत यांनी एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून अजूनही शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याचं पहायला मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर जनतेची कामे झाल्याने जनतेच्या मनात जाऊन बसणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे अस मोठ विधान त्यांनी केल्याने मुख्यमंत्रीपदावरून शिंदे गटात मोठी अस्वस्थता असल्याचे पाहायला मिळत आहे.