Wednesday, January 14, 2026 11:49:47 AM

Nagpur Govt ITI Renamed: नागपूर शासकीय ITI ला श्री संत जगनाडे महाराजांचे नाव; देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडला नामांतर सोहळा

या नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. आज संत जगनाडे महाराजांची जयंती असल्याने याच दिवशी नागपूर ITI चे नामकरण करण्यात आले.

nagpur govt iti renamed नागपूर शासकीय iti ला श्री संत जगनाडे महाराजांचे नाव देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडला नामांतर सोहळा

Nagpur Govt ITI Renamed: महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (ITI) संत आणि महापुरुषांची नावे देण्याचा महत्त्वपूर्ण आणि सांस्कृतिकदृष्ट्या अर्थपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून, नागपूर येथील शासकीय ITI ला संत जगनाडे महाराजांचे नाव देण्यात आले आहे. या नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. आज संत जगनाडे महाराजांची जयंती असल्याने याच दिवशी नागपूर ITI चे नामकरण करण्यात आले. या समारंभाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. 

संत जगनाडे महाराज, समानता आणि मानवतेचे प्रतीक

संत जगनाडे महाराज हे समाजातील समानता, सामाजिक उन्नती आणि मानवतेचा संदेश देणारे अग्रणी संत म्हणून ओळखले जातात. संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा त्यांनी व्यापक प्रसार केला. ज्या काळात समाजात जातिभेद प्रबळ होता, त्या काळात सर्वांना समानतेची वागणूक मिळावी, हे सांगणारे ते थोर समाजसुधारक होते.

हेही वाचा - Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे मार्गावर डिजिटल नजर; ओव्हरस्पीडिंगला लगाम, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

संतांचा वारसा पुढील पिढीकडे नेण्याचा उपक्रम 

दरम्यान, यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, वर्षानुवर्षे समाजासाठी कार्य करणाऱ्या संतांच्या योगदानाची जाण विद्यार्थ्यांना व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यांच्या मते, कौशल्य शिक्षण आणि सांस्कृतिक मूल्यांचे एकत्रिकरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे आहे.

हेही वाचा - Leopard Attack: वन्यप्राणी हल्ल्यांवर सरकारचा निर्णय; बिबट्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबासाठी नोकरीचा प्रस्ताव चर्चेत

तांत्रिक शिक्षणात संतांचे मूल्य 

राज्यातील ITI मध्ये प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. संस्थांना संतांचे नाव मिळाल्याने विद्यार्थ्यांना प्रेरणादायी जीवनचरित्रांची ओळख, सामाजिक कर्तव्यांची जाणीव, आणि नैतिक मूल्यांचे महत्व समजण्यास मदत होणार आहे. यामुळे तांत्रिक कौशल्याबरोबरच चारित्र्य विकासाची संधीही मिळेल.
 


सम्बन्धित सामग्री