महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत एका गायिकेने अक्षरश: खालच्या शब्दात टिका केली आहे. बलात्काराच्या संदर्भात वक्तव्य करताना गायिका अंजली भारती हिने अत्यंत खालच्या स्तराला जाऊन मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांच्याबद्दल वक्तव्य केले होते.
भंडारा येथील भीम मेळाव्यात हे वक्तव्य केले होते. खासदार संजय निरूपम यांनी अंजली भारतीचा व्हिडीओ पोस्ट करत टिका केली होती. आता यावरून राजकीय क्षेत्रातून अंजली भारतीवर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. आता चित्रा वाघ यांनी या सर्व प्रकारावर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, "अंजली भारतीच्या व्हिडीओने तळपायाची आग मस्तकात गेली आहे. राजकीय विरोध असू शकतो पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करा असं म्हणणं किती चुकीचं आहे. या बाइच्या बुद्धीची किव करावीशी वाटते. ही एक विकृती आहे...