Tuesday, May 20, 2025 02:28:46 PM

अटीशर्थी घालण्याचा अधिकार राजना आहे का?; राज-उद्धव युतीवर संदीप देशपांडेंचे भाष्य

अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज यांनी राज-उद्धव युतीवर भाष्य केले आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अटीशर्थी घालण्याचा अधिकार राजना आहे का राज-उद्धव युतीवर संदीप देशपांडेंचे भाष्य

मुंबई : राज्यात सध्या राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार यावर चर्चा सुरू आहेत. मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी एकत्र काम करण्याची तयारी असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज यांनी राज-उद्धव युतीवर भाष्य केले आहे. यावर उद्धव ठाकरे यांनीही किरकोळ भांडणं मी देखील बाजूला ठेवायला तयार असल्याचे सांगितले आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

संदीप देशपांडे म्हणाले, या सगळ्यामध्ये चर्चा सुरू असताना मी तुम्हाला 2017 चा प्रसंग सांगतो. श्रीधर पाटणकर मला भेटले तेव्हा ते म्हणाले की दोन भावांनी एकत्र आले पाहिजे. मी राज साहेबांशी चर्चा केली आणि आम्ही मग पुढे गेलो. आम्ही भेटलो, संतोष धुरी उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की भाजपसोबत लग्न मोडू दे मग आपण आपला साखरपुडा करू. त्यांनी युती मोडला आणि आमचाही फोन त्यांनी उचलला नाही. त्यानंतरसुद्धा उद्धव साहेब आणि राज साहेब फोनवर बोले. त्यानंतरही बाळा नांदगावकर आणि अनिल देसाई बोले  असे देशपांडे यांनी सांगितले. 

पुढे बोलताना, राज साहेबांनी एबी फॉर्म थांबवले होते. पण त्यांनी त्याचे फॉर्म वाटले. त्यांनी आम्हाला धोका दिला. जे महाराष्ट्राचे शत्रू राज साहेबांसोबत जेवतात. मग ते अगोदर तुमचे शत्रू का नव्हते. तेव्हा भाजपचा विरोध आम्ही करत होतो. जेव्हा तुमचे 50 टक्के वाटप झाले. तेव्हा तुम्हाला भाजप आवडायचा ना.. पण 2019 नंतर तुमचा वाद झाला. तेव्हापासून भाजप महाराष्ट्र द्रोही झाले का? असा सवाल मनसे नेते देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना केला. 
 हेही वाचा : Uddhav and Raj Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?

'तुम्हाला अगोदर कळालं नाही का?'
तुम्हाला अगोदर कळालं नाही का? पण त्या भाजपसोबत युती का केली? तुम्ही युती तोडली आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले. जर तुम्हाला भाजपने मुख्यमंत्रीपद दिले असते तर मग तुम्हाला  भाजप चालले असते का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उद्धव यांना विचारला आहे. तसेच तुम्ही आम्हाला काय सांगता याला भेटू नका, तुम्ही सांगू नका, तुम्ही आम्हाला सांगाल की आम्ही वाईट आहोत अन् मग युती करायची का? असा सवाल राज-उद्धव युतीवर देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. 

'आम्ही युतीमध्ये येणार  नाही'
 तुम्हाला युती करण्याचा नैतिक आधिकार नाही. किरकोळ वाद मिटावे महाराष्ट्राला आनंद होईल. 2012 साली नाशिकमध्ये शिवसेनेने मनसेला पाठिंबा दिला नाही आणि आताची नैतिकता म्हणजे काय? असा सवाल देशपांडे यांनी उद्धव यांना केला आहे. एकत्र आले तर महाराष्ट्राला आनंद होईल पण बाकी धोका दिला त्याचं काय करायचं आहे. युती करायची की नाही हे राज साहेब ठरवतील. आम्ही काही युतीमध्ये येणार  नाही. 


सम्बन्धित सामग्री