रायगड: महाराष्ट्राचं अराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम शनिवारी किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रमुख उपस्थिती दिली. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विचार व्यक्त केले. त्यासोबतच, 'छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व हे केवळ देशालाच नाही, तर संपूर्ण जगाला प्रेरणा देणारा आहे', असे देखील त्यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले अमित शाह?
'माझं भाग्य आहे की मला महाराष्ट्राचं अराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला बोलवण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म देणाऱ्या राजमाता जिजाऊंना मी नमन करतो. राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना केवळ जन्मच नाही दिला, तर त्यांनी शिवरायांना स्वराज्य हा विचार दिला. इतकंच नाही तर, राजमाता जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचे काम देखील केले. ज्या ठिकाणी सुवर्ण सिंहासन होतं तिथे मी शिवरायांना अभिवादन केलं. त्यावेळी माझ्या मनात ज्या भावना उचंबळून आल्या, त्या भावनांना मला शब्दांमध्ये मांडता येणार नाही. तेव्हा मी एका अशा महान व्यक्तीच्या राज दरबरात उभा होतो, ज्या व्यक्तीने मराठा स्वराज्य आणि स्वधर्मासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं.
आदिलशाही, निजामशाही, सिद्दी आणि अशा अनेक मुघल साम्राज्यांनी वेढलेला या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्यात बदलण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलं आहे. त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले आणि स्वराज्याचं स्वप्न यशस्वी झालं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र अंधकारात बुडालं होतं. तेव्हा कोणी स्वराज्याची कल्पनाही करू शकत नव्हतं. स्वधर्म आणि स्वराज्य याबद्दल बोलणं म्हणजे गुन्हा अशी समजूत होती. पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आणि भगवा फडकवण्यासाठी प्रतिज्ञा घेतली होती. आजपर्यंत मी अनेक नायकांची चरित्रे वाचली आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे साहसी, दृढ इच्छाशक्ती असलेले आणि अकल्पनीय रणनीती असलेले व्यक्ती मी पाहिले नाहीत.
त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. स्वराज्याचं स्वप्न यशस्वी झालं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माच्यावेळी महाराष्ट्र अंधकारात बुडाला होता. स्वराज्याची कल्पनाही कुणी करत नव्हतं. स्वधर्म आणि स्वराज्य याबाबत बोलणं लोक गुन्हा समजू लागले होते. पण शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, भगवा फडकवण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. मी आजवर अनेक नायकांची चरित्रं वाचली आहेत. मात्र असं साहस, दृढ इच्छाशक्ती, अकल्पनीय रणनीती मी एकाही व्यक्तिमध्ये पाहिली नाही', असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
महाराष्ट्रातील लोकांना माझी हात जोडून विनंती आहे:
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील जनतेला हात जोडून विनंती केली, 'छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे किंवा देशाचे नाहीत, तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचं स्वधर्म, स्वराज्य आणि त्यांच्या विचारसरणी हे फक्त देशाच्या सीमेपर्यंत मर्यादित नाही, तर संपूर्ण लोकांच्या स्वाभिमानाशी जोडलं गेलं आहे.
पुढे गृहमंत्री अमित शाह म्हणाले, 'ज्या काळात भारतावर मुघल, ब्रिटिश आणि इतर साम्राज्यांकडून वारंवार आक्रमण होत होतं आणि गुलामगिरी वाढत होती, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचा दीप प्रज्वलित केला आणि त्यांच्या संघर्षाने, त्यागाने आणि दूरदृष्टीने एका नवीन युगाची सुरुवात झाली'.