मुंबई : राज्यात महायुती सरकार स्थापन झाले. त्यानंतर पालकमंत्रीपदाची प्रतिक्षा होती. आता महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही ठाणे आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
महायुतीच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे गेले आहे. तर वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ असणार आहेत. सांगलीचे पालकमंत्रीपद चंद्रकांत दादा, नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन, पालघरचे पालकमंत्रीपद गणेश नाईक, जळगांवचे पालकमंत्रीपद गुलाबराव पाटील, यवतमाळचे पालकमंत्रीपद संजय राठोड यांना मिळाले आहे. तर मुंबई उपनगरचे पालकमंत्रीपद मंगलप्रभात लोढा, रत्नागिरीचे पालकमंत्रीपद उदय सामंत, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जयकुमार रावल, जालनाचे पालकमंत्रीपद पंकजा मुंडे, नांदेड पालकमंत्रीपद अतुल सावे, चंद्रपूरचे पालकमंत्रीपद अशोक उईके, सातारा जिलह्याचे पालकमंत्रीपद शंभूराज देसाई, रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे, लातूरचे पालकमंत्रीपद शिवेंद्रसिंह भोसले, नंदूरबारचे पालकमंत्रीपद माणिकराव कोकाटे यांना मिळाले आहे.
हेही वाचा : छगन भुजबळांची नाराजी कायम
सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी जयकुमार गोरे यांच्यावर सोपावण्यात आली आहे. तर हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धूरा नरहरी झिरवाळ यांच्याकडे दिली गेली आहे. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद संजय सावकारे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद संजय शिरसाट, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद प्रताप सरनाईक, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मकरंद जाधव-पाटील, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नितेश राणे, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आकाश फुंडकर, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बाबासाहेब पाटील यांना मिळाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद विभागले आहे. प्रकाश आबिटकर यांना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. परंतु सह-पालकमंत्रीपदाची जबाबदारी माधुरी मिसाळ यांना देण्यात आली आहे. गडचिरोली जिलह्याच्या सह-पालकमंत्रीपदाची जबाबदारी आशिष जयस्वाल यांना देण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद डॉ. पंकज भोयर आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मेघना बोर्डीकर यांना देण्यात आले आहे.