गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादमधील पाणी प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, औरंगाबादमधील पाणी प्रश्नाचा मुद्दा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनातील क्रांतीकारी गॅलरीच्या उद्घाटनावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादचा पाणीप्रश्न उपस्थित केला असून भगतसिंह कोश्यारी यांनी थेट औरंगाबादचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान मोदींना साद घातली आहे. मोदीजी, औरंगाबादचा पाणी प्रश्न सोडवा, अशी विनंती राज्यपालांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.
औरंगाबादमधील पाणीप्रश्न गंभीर असल्याचे राज्यपालांनी राजभवनातील भाषणात सांगितले आहे. शहराला सात-सात दिवसांनी पाणी येत आहे, हे योग्य नसल्याचे राज्यपाल म्हणाले. त्यामुळे पंतप्रधान मोदींनीच औरंगाबादचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी विनंती राज्यपालांनी केली आहे. मोदी है तो मुमकीन है, त्यामुळे औरंगाबादमधील पाणी योजना पंतप्रधान यांनी पूर्ण करावी, असे राज्यपाल म्हणाले.
पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमादरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील अनेक सिंचन प्रकल्प अद्यापही अपूर्ण असल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
तसेच, मी पदवीदान समारंभात मराठीचा वापर वाढवला असून राजभवन हे एक लोकभवन व्हावं, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. तसेच सर्वांच्या सहकार्यातून गॅलरीचं काम वेळेत पूर्ण केले असल्याचेही राज्यपाल म्हणाले.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना नुकताच…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर टीका…
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चार ते पाच…
७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडला. यावेळी देशाला संबोधित…
देशाचा आज ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज शासकीय कार्यालये,…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणात त्यांनी देशाच्या आशा-आकांक्षा…