राज्यात सध्या कोणतेही निर्बंध लागणार नसल्याचं स्पष्टीकरण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात डेल्टा व्हेरियएंटनं शिरकाव केल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहेत अशी माहिती टोपेयानें दिली आहे. राज्यभरात डोल्टाचे २१ रुग्ण असून त्यापैकी आज एका ८० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. या व्यक्तीला इतरही काही आजार होते अशी माहिती मिळत आहे. डेल्टासाठी प्रत्येक जिल्ह्यातून शंभर सॅम्पल प्रत्येक महिन्याला मागवण्यात येत आहेत आणि त्यातून डेल्टा प्लस रुग्णांचा शोध घेतला जात आहे.
राज्यात सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रत्नागिरीत ९, जळगावात ७, मुंबईत २ आणि पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी १ रुग्ण आहे. प्रथम डेल्टा होता. मात्र नंतर डेल्टा प्लस आला. डेल्टाने त्याचे रुप बदलले आहे का, याचा आता बारकाईने अभ्यास सुरू झाला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. सध्या डेल्टा व्हेरियंटची कमी संख्या आहे. त्यामुळं राज्यात सध्या तरी कोणतेही निर्बंध लागणार नसल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यावरून…
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अखेर राजीनामा दिलाय. बिहारमध्ये 5 वर्षानंतर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू…
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. त्यांनी आतापर्यंत…
राज्यात मोठ्या सत्तांतरणानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाने नवे सरकार स्थापन झाले. या…
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असल्यापासूनच एकाही महिलेचे नाव चर्चेत नव्हते. शिंदे-फडणवीस सरकारकडून अचानक धक्का दिला…
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी झाला आहे. एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची…