१४ ऑगस्ट आता फाळणी यातना स्मृती दिन

रविवारी संपूर्ण देशभरात भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरु आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्वाची घोषणा केली असून फाळणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी यातना स्मृती दिन’ (विभाजन विभीषिका स्मृति दिवस) म्हणून ओळखला जाईल असं सांगितलं आहे.
देशाच्या फाळणीला कधीही विसरले जाऊ शकत नाही. द्वेष आणि हिसेंमुळे आपल्या लाखो लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्या लोकांचा संघर्ष आणि त्यागाच्या आठवणीत १४ ऑगस्टला ‘फाळणी यातना स्मृती दिन ‘ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं मोदी म्हणालेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.
#PartitionHorrorsRemembranceDay का यह दिन हमें भेदभाव, वैमनस्य और दुर्भावना के जहर को खत्म करने के लिए न केवल प्रेरित करेगा, बल्कि इससे एकता, सामाजिक सद्भाव और मानवीय संवेदनाएं भी मजबूत होंगी।
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2021
फाळणीच्या जखमा आजही ताज्या आहेत. लाखो लोकांना यावेळी स्थलांतर करावे लागले होते. माहितीनुसार, जगातील हे सर्वात मोठ्या स्थलांतरांपैकी एक होते. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंद होता. पण, त्याचवेळी भारत-पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या. पाकिस्तानातून भारतात आणि भारतातून पाकिस्तानात असे मोठ्या प्रमाणात लोकांनी स्थलांतर केले. या काळात हिंसाचाराच्या घटना घडल्या. दोन्ही बाजूंनी हिंसा झाली. यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस फाळणी यातना स्मृती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.