मुंबई : मुंबईत बेकायदेशीर पद्धतीने राहणारे रोहिंगे, बांगलादेशी, पाकिस्तानी यामुळे सरकारही मेटाकुटीला आले आहे. त्यामुळे शहरात घुसखोरी केलेल्या बांगलादेशींना शोधून त्यांना देशाबाहेर काढण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आपल्याला मुंबई बांगलादेशमुक्त करायची आहे. जिथे जिथे बांगलादेशी आहेत तिथे त्यांनी काही आधार कार्ड, काही सरकारी कागदपत्रे घेतली आहेत. त्यांची चौकशी केली जाईल आणि आधार कार्डसारखी सर्व कागदपत्रे पडताळून रद्द केली जातील आणि बांगलादेशींना परत पाठवले जाईल."
तसेच "वंदे मातरमची अॅलर्जी काय आहे? वंदे मातरम हे राष्ट्रगीत आहे. आपल्या देशभक्त स्वातंत्र्यसैनिकांनी आपले बलिदान दिले आहे. यात काय चूक आहे? प्रत्येकाने वंदे मातरम म्हणावे. जेव्हा त्यांनी (उद्धव ठाकरे) २०१९ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा त्याग केला, तेव्हाच आम्ही सरकार बदलले. आम्ही लोकांच्या हृदयात असलेले सरकार आणले आहे आणि म्हणूनच आम्ही बाळासाहेब ठाकरे जींच्या विचारांना पुढे नेत आहोत, विकासाला पुढे नेत आहोत", असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा : Amit Thackeray On Musical Road: 'मुंबईकरांना खरंच याची गरज आहे का?'; कोस्टल रोडवरील 'म्युझिकल रोड'वरून अमित ठाकरेंचा सरकारवर निशाणा