Tuesday, May 20, 2025 03:13:43 PM

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या 12 व्या वर्धापनदिनानिमित्त MPCB अध्यक्ष सिद्धेश कदमांची भेट

1 मे 2025 रोजी, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा 12 वा वर्धापनदिन संपन्न झाला. यावेळी, नेते सिद्धेश कदम यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या कामकाज आणि त्याच्या ध्येयाविषयी महत्वाची चर्चा केली.

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या 12 व्या वर्धापनदिनानिमित्त mpcb अध्यक्ष सिद्धेश कदमांची भेट

मुंबई: 1 मे 2025 रोजी, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा 12 वा वर्धापनदिन संपन्न झाला. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आता 13 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. या पार्श्वभूमीवर, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या कार्यालयामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे अध्यक्ष आणि नेते सिद्धेश कदम यांनी भेट दिली. यादरम्यान, संपादक आशुतोष पाटील यांनी नेते सिद्धेश कदम यांचं स्वागत केले आणि त्यासोबतच, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या कामकाज आणि त्याच्या ध्येयाविषयी महत्वाची चर्चा केली.

हेही वाचा: 12 व्या वर्धापनदिनानिमित्त दिग्दर्शक केदार शिंदेंनी दिली जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला भेट

यावेळी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या कामाचा आढावा घेतला. यानंतर, संपादक आशुतोष पाटील यांनी नेते सिद्धेश कदम यांना गेस्ट एडिटर म्हणून भूमिका निभवण्याची विनंती केली. त्या प्रदूषण नियंत्रणासंदर्भात काही काही ठोस भूमिका मांडल्या.

 इनपुट डिपार्टमेंटकडून महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर नेते सिद्धेश कदम यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमधील आउटपुट डिपार्टमेंटसोबत संवाद साधला आणि महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला. यावेळी, सिद्धेश कदमांनी मार्गदर्शन करत, 'गॅस सिलेंडरच्या दरातील उतरलेल्या भावाची बातमी प्राधान्यानं घ्यायला सांगत, आज ज्या आपल्या माता भगिनी आहेत, जे चूल पेटवतात, आपल्याला जेवण देतात. यांच्यासाठी गॅस सिलेंडरची बातमी महत्त्वाची असून, शासनाकडे हीच मागणी असते की कमीत कमी दरात ती कशी आपल्या माता भगिनींना मिळणार. आताचे मुख्यमंत्री लाडक्या बहिणींसाठी विविध योजना सुद्धा आणतात. तर त्या माध्यमातून ही एक चांगली बातमी असू शकते'.


सम्बन्धित सामग्री