अभिनेता रजनीकांत आगामी लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची चर्चा केली जात होती. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीतून रजनीकांत यांनी माघार घेतले असल्याचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे सुपस्टार रजनीकांत यांचे चाहते नाराज झाले आहेत. तसेच तामिळनाडूमध्ये पाण्याची मोठी समस्या असल्याने नागरिकांनी या प्रश्नांवर तोडगा काढणाऱ्या पक्षालाच निवडून आणावे असेही त्या पत्रकात म्हटलं आहे.
रजनीकांत यांनी पत्रकात काय म्हटलं ?
आगामी लोकसभा निवडणुकीतून मी माघार घेतली आहे.
तसेच माझा पक्ष रजनी मक्कल मंद्रम सुद्धा सहभागी नसणार आहे.
लोकसभा निवडणुकांऐवजी तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकांवर आमचे लक्ष आहे असेही त्यांनी सांगितले आहे
आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.
कार्यकर्त्यांनी पक्षाचं चिन्हं, झेंडा, फलक अशा कोणत्याही वस्तूचा वापर इतर पक्षाच्या प्रचारासाठी करू नये.
सुपरस्टार निवडणुक लढणार नसल्याने त्यांचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना नुकताच…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर टीका…
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चार ते पाच…
७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडला. यावेळी देशाला संबोधित…
देशाचा आज ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज शासकीय कार्यालये,…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणात त्यांनी देशाच्या आशा-आकांक्षा…