दिवाळी सणाच्या काही दिवसानंतर तुळशी विवाह साजरा केला जातो.
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी ते पौर्णिमेपर्यंत हा विवाह केला जातो.
तुळशी विवाहाच्या दिवशी ''हे'' उपाय केल्याने तुम्हाला भगवान विष्णुचा आशिर्वाद मिळेल.
या दिवशी तुळशीला ओढणी अर्पण करावी. असे केल्याने विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होतात.
तुळशीला पिवळा धागा बांधल्याने, तुळशी विवाहाच्या दिवशी भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण होते, अशी मान्यता आहे.
सुर्यास्तानंतर तुळशीसमोर तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता वाढते.
तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला हळद असलेले दुध अर्पण करा.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)