Operation Sindoor: भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारत पुन्हा हल्ला करू शकतो, अशी भीती पाकिस्तानला आहे. दरम्यान, पीएमएलएन (पाकिस्तान मुस्लिम लीग-एन) चे खासदार ताहिर इक्बाल हे पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये रडू लागले. पीएमएलएन हा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा पक्ष आहे. ताहिर इक्बाल यांनी पाकिस्तानी संसदेत म्हटले की, 'हां हमने गुनाह किए हैं.. अल्लाह हमारी हिफाजत करे'. ताहिर इक्बाल हे राजकारणात येण्यापूर्वी पाकिस्तानी सैन्यदलात होते. ते निवृत्त मेजर आहेत.
भारताने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यासह अनेक नेते भारताच्या कारवाईने घाबरले आहेत. बुधवारी (7 मे 2025) भारतीय सैन्याने पीओके आणि पाकिस्तानच्या अनेक भागात हवाई हल्ले केले आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर, घाबरलेल्या पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या अनेक लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
हेही वाचा - पाकिस्तानचा नापाक कारवाई! भारतातील 15 प्रमुख शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न
भारताने पाकिस्तानचे क्षेपणास्त्र पाडले
पाकिस्तानने भारतातील 15 शहरांना लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, त्यापैकी 7 शहरे पंजाबमध्ये होती. भारताच्या एस-400 ने पाकिस्तानचे क्षेपणास्त्र आकाशातच नष्ट केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी (8 मे 2025) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सांगितले की, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान 100 दहशतवादी मारले गेले. मात्र, पाकिस्तान हा आकडा कमी सांगत असून ते मारले गेलेले लोक सामान्य नागरिक असल्याचा रडीचा डाव पाकिस्तानकडून खेळला जात आहे.
भारताच्या सीमेवर आणि LoC वर पाकिस्तानी लष्कराचे हल्ले
सीमेवर आणि LoC वर पाकिस्तानी लष्कराकडून सतत गोळीबार करण्यात येत आहे. या हल्ल्यांमधील येथील महिला, लहान मुलांसह सामान्य नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. मात्र, दहशतवाद आणि पाकिस्तानचे नसते उपद्व्याप यांच्याबाबत भारताने शून्य सहनशीलतेची (Zero Tolerance) कडक भूमिका घेतली आहे.
भारत योग्य उत्तर देईल - संरक्षण मंत्री
संरक्षणमंत्र्यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या नेत्यांना असेही सांगितले की, ही अजूनही चालू असलेली कारवाई आहे आणि जर भारताच्या लक्ष्यित हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने कोणतीही लष्करी कारवाई केली तर भारत त्याला योग्य उत्तर देईल. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला बहावलपूर आणि लष्कर-ए-तैयबाचा मुरीदके तळ यांचा समावेश आहे.
हेही वाचा - पाकिस्तानवर आणखी एक कारवाई! भारतीय हल्ल्यात लाहोरमध्ये हवाई संरक्षण प्रणाली नष्ट